शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

गोकुळ शिरगावची स्मशानभूमी गायब

By admin | Updated: October 6, 2015 00:40 IST

जागेचा वाद पेटला: उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ

कोल्हापूर : ऐतिहासिक श्रीकृष्ण मंदिर, औद्योगिक वसाहतीमुळे देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या, महसुली उत्पन्नात जिल्'ात द्वितीय स्थानी असलेल्या गोकुळ शिरगावची स्मशानभूमीच गायब झाली आहे. पाडण्यात आलेले जुने स्मशानशेड आणि अर्धवट अवस्थेतील नव्या स्मशानशेडच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना सध्या उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावाच्या लोकसंख्या वाढीनुसार गुरुवारपर्यंत (दि. १) अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची ३५ वर्षांपूर्वी उभारणी केल्याचे समजते. या बांधकामावेळी राष्ट्रीय महामार्ग दुपदरी होता. पर्यायाने स्मशानशेडसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होती. मात्र, महामार्ग चौपदरीकरणावेळी सध्याची अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची काही जागा शासनाने संपादित केली. परिणामी, स्मशानशेडमध्ये अंत्यसंस्कार व इतर विधी करण्यास जागा अपुरी पडत होती. त्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावठाणातील लोकांसाठी सध्याच्या स्मशानभूमीचे विस्तारीकरण करून चित्रनगरी परिसरातील गायरान जमिनीकडे नवी स्मशानभूमी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निधीची उपलब्धता करण्यात आली. त्यानुसार करवीर निवासिनी देवस्थानच्या पोटखराब १३ गुंठे जागेत ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या स्मशानभूमी विस्तारीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामावर या परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला. शिवाय करवीर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. मात्र, ग्रामपंचायतीने संबंधित स्मशानशेडचे काम सुरू ठेवले. यावर येथील बाळासो चव्हाण यांनी न्यायालयात दावा दाखल करून संबंधित कामाला तात्पुरती मनाई मिळविली. या वादातच सध्या अस्तित्वात असलेले स्मशानभूमीवरील पत्राशेड व बांधकाम अज्ञातांकडून पाडण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका महिलेच्या पार्थिवावर नव्या स्मशानभूमीच्या वादग्रस्त जागा व बांधकामासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. सार्वजनिक प्रश्नांवर वाद टाळून सर्वसामंजस्याने मार्ग काढून हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी जशी ग्रामपंचायतीची आहे, तसेच गावातील नेतेमंडळी आणि ग्रामस्थांची आहे. अन्यथा उद्या एखादा मृतदेह ग्रामपंचायतीच्या दारात अंत्यविधीसाठी आल्यास आश्चर्य वाटायला नको. (प्रतिनिधी)असा झाला स्मशानशेडचा प्रवासगावातील ३५ वर्षांपूर्वीची परंपरागत स्मशानभूमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ओढ्यानजीकच्या खासगी पडीक जागेत आहे. गुरुवारपर्यंत सदर स्मशानशेडचा वापर सुरू होता. ही स्मशानभूमी अस्तित्वात येण्यापूर्वी सध्या वादग्रस्त असलेल्या नव्या स्मशानशेडच्या बांधकामाशेजारी ओढापात्राजवळ काही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यापूर्वी गावातील ‘पाणोता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याजवळील जागेत अंत्यसंस्कार केले जात होते. काही ग्रामस्थांच्या स्वत:च्या शेतीत अथवा सरकारी पडजागेत मृतदेहांचे दहन अथवा दफन करण्यात येत होते.गेल्या तीन दिवसांपूर्वी अस्तित्वात असलेले स्मशानशेड खासगी जागेत होते. वर्षाकाठी गावातील मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० ते ६० इतके आहे. संबंधित स्मशानशेड एकापेक्षा अधिक मृतदेहांच्या अंत्यसंस्काराला अपुरी पडत होते. त्यावर ग्रामस्थांनी ग्रामसभेद्वारे स्मशानभूमीच्या दक्षिण-उत्तर परंपरागत जागेत सुशोभीकरण व विस्ताराची मागणी केली. त्यानुसार ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू केले. या ठिकाणी मृतदेहांच्या दहनानंतर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही, अशी दक्षता घेतली जाणार आहे. या बांधकामासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत.- एकनाथ सूर्यवंशी, ग्रामसेवकवाद कायमगावात नेतेमंडळींची संख्या कमी नाही. मात्र, त्यांच्याकडून स्मशानभूमीसारख्या प्रश्नावर कधी गंभीर भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या राजकारणामुळे आज स्मशानभूमी गायब होण्याचा प्रकार घडला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार अमल महाडिक यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची सूचना यापूर्वीही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.वादाचा मुद्दा असा...जुन्या स्मशानशेडच्या दुरुस्तीऐवजी, ग्रामपंचायतीकडून निधीचा दुरुपयोग करून सध्या उभारण्यात येत असलेल्या नव्या स्मशानशेडमुळे नागरिकांना प्रदूषणास सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले स्मशानशेड अपुरी पडत असल्याने नव्या जागेत प्रशस्त स्मशानशेड उभे करून नागरिकांची गैरसोय टाळली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवे स्मशानशेड उभारावे, अशी बहुतांश ग्रामस्थांची मागणी असल्याने ग्रामपंचायत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून स्मशानशेडचा वाद पेटला आहे. गावातील आघाड्यांच्या राजकारणामुळे स्मशानशेड दुरुस्तीचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला असून, सध्या उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची लाजिरवाणी वेळ ग्रामस्थांवर आली आहे. केवळ जमिनीचे वाढते भाव आणि नवीन स्मशानभूमीमुळे जागांचे दर पडण्याची भीती हाच स्मशानभूमी गायब होण्यामागील कळीचा मुद्दा असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.