शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

‘गोकुळ’च्या सत्ताधारी पॅनेलमध्ये चंदगडला प्रथमच दोन जागा

By admin | Updated: April 10, 2015 23:52 IST

बदललेल्या परिस्थितीचा लाभ : दीपक पाटील, राजेश पाटील यांना उमेदवारी, विरोधी पॅनेलमध्ये सुरेशराव चव्हाण-पाटील

नंदकुमार ढेरे - चंदगड -‘गोकुळ’ दूध संघाला चंदगड तालुक्यातून प्रथमच दोन उमेदवारांना सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी का होईना, चंदगड तालुक्यातील दूध उत्पादकांची मागणी पूर्ण झाली आहे. विद्यमान संचालक दीपक पाटील व राजेश पाटील यांना सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात यापुढे वेगळी समीकरणे मांडली जाणार असल्याचे संकेत आहेत.‘गोकुळ’च्या उमेदवारीसाठी सर्वजण आग्रही असतात. आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात माजी मंत्री सतेज पाटील, विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक व नाराज कार्यकर्त्यांची आघाडी, अशी लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ‘गोकुळ’च्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात आता जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींना चंदगड तालुक्याचे सहकार्य लाख मोलाचे वाटत आहे. ज्याच्याकडे जास्त ठराव त्याला उमेदवारीचा पायंडा राजेश पाटील यांनी ‘गोकुळ’ची उमेदवारी मिळवित मोडीत काढला आहे. चंदगड तालुक्यामध्ये ३२२ संस्था मतदानाला पात्र आहेत. यापैकी विद्यमान संचालक दीपक पाटील यांच्याकडे २०५, तर राजेश पाटील यांच्यासह गोपाळराव पाटील, सुरेश चव्हाण-पाटील व राष्ट्रवादीकडे ११७ ठराव आहेत, असे चित्र आहे. तालुक्यामध्ये ‘गोकुळ’च्या स्थापनेपासून संचालकपद नव्हते. त्यानंतर ‘गोकुळ’मध्ये मारुती कांबळे यांनी सर्वप्रथम, त्यानंतर महादेव कांबळे, नामदेव कांबळे यांनी संचालकपद भूषविले. माजी मंत्री भरमू पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांनी सलग दोनवेळा ‘गोकुळ’चे संचालकपद मिळविले. आता तिसऱ्यांदाही ते रिंगणात आहेत. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे पुत्र, तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांना प्रथमच संधी देऊन आमदार महादेवराव महाडिक यांनी वेगळाच डाव खेळल्याचीचर्चा आहे. राजेश पाटील यांना उमेदवारी मिळण्यास जिल्ह्यातील बदललेले राजकारणही कारणीभूत आहे. प्रा. संजय मंडलिक हे राजेश पाटील यांचे मेहुणे असल्याने, जरी ते विरोधी पॅनेलला पाठिंबा देत असले, तरी काही क्रॉस मते राजेश पाटील यांना मिळतील, असे काहीसे गणित मांडले जात आहे. ‘शत्रूचा-शत्रू तो आपला मित्र’, याची या निवडणुकीत प्रचिती येताना दिसत आहे.विधानसभेत खासदार व आमदारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना यावेळी ‘गोकुळ’मध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये सर्वकाही चालते; पण कार्यकर्त्यांनी काही केले की तो कार्यकर्ता बाद, असा शिक्का मारला जातो. मात्र, या निवडणुकीत कार्यकर्त्यांपेक्षाही नेत्यांचे सोयीस्कर राजकारण जनता अनुभवत आहे.