शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

‘गोकुळ’ला अरुण नरके यांच्या मार्गदर्शनाची गरज: शाहू महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:03 IST

कोल्हापूर : धवलक्रांतीत वर्गीस कुरियन यांच्यानंतर अरुण नरके यांचे या क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. त्याच्या या अनुभवाची, मार्गदर्शनाची गरज ...

कोल्हापूर : धवलक्रांतीत वर्गीस कुरियन यांच्यानंतर अरुण नरके यांचे या क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. त्याच्या या अनुभवाची, मार्गदर्शनाची गरज आजही गोकुळ दूध संघाला आहे. ‘गोकुळ’चे संचालक चांगले काम करीत आहेत; पण नरके यांनी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज यांनी गुरुवारी येथे केले.पन्हाळा-गगनबावडा वाहतूक ठेकेदार सत्कार समिती, गोकुळ दूध संघ व कर्मचारी आणि नरके कुटुंबीय यांच्यातर्फे अरुण नरके यांचा अमृतमहोत्सवी सत्कार झाला. दुधाळी मैदानावर झालेल्या या अत्यंत शानदार सोहळ््यात छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांचा गायवासरुची चांदीची मूर्ती देऊन सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, बाळ पाटणकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह ‘गोकुळ’मधील सर्व संचालक व विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. संचालक विश्र्वास जाधव यांनी या सत्कारासाठी पुढाकार घेतला.शाहू महाराज यांनी नरके यांच्यासोबतच्या आजवरच्या वाटचालीचा व सहवासाचा आढावा घेताना त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अरुण नरके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. गेली ५० वर्षे त्यांचे शेती, क्रीडा, सहकार येथे अमूल्य योगदान मी पाहत आलो असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अरुण नरके म्हणाले, ‘आतापर्यंत कधी वाढदिवस साजरा केला नाही. वडिलांच्या इच्छेने शेती आणि खेळात रमलो. यातून संस्थांमध्ये काम सुरू केले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जवळ जाता आले. माझी चौथी पिढी शेतात असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. महाराष्ट्रात फक्त ‘गोकुळ’मुळेच काम करायला मिळाले. महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, यशवंत एकनाथ पाटील, डी. सी. नरके, शशिकांत नरके यांच्यामुळे मी घडलो.’सदानंद बोरसे म्हणाले, ‘सहकार म्हणजे स्वाहाकार अशी मध्यमवर्गीय मानसिकता असते; पण ‘गोकुळ गाथा’ पुस्तकाची संहिता हातात आल्यानंतर नरके जसे आहेत तसे प्रांजळ स्वरूपात समोर आले. सर्वसामान्यांना घेऊन या नंदराजाने ‘गोकुळ’चे कुटुंब मोठे केले.’प्रास्ताविकात अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ओबेरॉय म्हणाले, ‘नरके यांच्या कामाचा मोठा आवाका आहे. शेतीत नवीन प्रयोग करण्याची त्यांना सवय आहे. आमदारकी निवडली नाही तरी आमदार निवडण्यात महत्त्वाची भूमिका राहिली.’सत्कार सोहळ्यास चेतन नरके, अजित नरके, सत्यशील नरके, देवराज नरके, स्नेहा नरके, स्निग्धा नरके, जयश्री नरके, लीना तुपे, सुमन नरके, शिल्पा नरके, ऐश्वर्या नरके या नरके कुटुंबीयांचा समावेश होता.डोळ््यात अश्रू...कुटुंबाला वेळ देऊ शकलो नसल्याची खंत आपल्याला सलत असल्याचे सांगताना नरके यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पत्नी सुनीता हिने खंबीरपणे सर्व कुटुंबाला सांभाळल्यामुळेच आज मी राष्ट्रीय स्तरापर्यंत काम करू शकलो, असेही त्यांनी नमूद केले.