सरत्या वर्षात ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅँकेने विक्रमी २६०० कोटींचा टप्पा गाठत ‘नाबार्ड’च्या लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला; तर ‘गोकुळ’ने उत्पादकांना भरघोस दूधदर फरक व दूध विक्रीत विक्रम करण्याची किमया केली. तसेच खासगी बॅँकांच्या आव्हानाला सक्षमपणे तोंड देण्याचे काम नागरी सहकारी बॅँकांनी केले आहे. एकंदरीत हे वर्ष सहकाराच्या दृष्टीने दिलासा देणारे ठरले आहे. सहकारातील घडामोडींचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतो. जिल्हा बॅँकेने आर्थिक अरिष्टातून बाहेर पडून तब्बल २६०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला. त्याचबरोबर १२ वर्षे रखडलेल्या ५०० कर्मचाऱ्यांना बढत्या मिळाल्या. ‘नाबार्ड’ने जिल्हा बॅँकेला ‘अ’ वर्ग दर्जा देऊन चांगल्या कामाचे प्रशस्तिपत्र दिले. एकाच वर्षात ‘गोकुळ’ने दोनवेळा दूध दरवाढ करत ४५ कोटींचा फरक देऊन दूध व्यवसायाला बळकटी देण्याचे काम केले. मध्यंतरीच्या पडझडीनंतर जिल्ह्यात ४९ नागरी बॅँका कार्यरत आहेत. बॅँकिंग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खासगी बॅँका स्थापण्याचा सपाटा लावला आहे. त्यात राज्य शासनाचे बॅँकिंग निर्बंध पाहता नागरी बॅँकांनी मल्टीस्टेट मार्ग धरला आहे. खासगी बॅँकांच्या व्याजदरामुळे नागरी बॅँकांकडील कर्जदारांची संख्या कमी होत असून, बॅँकांचा सिडी रेशो सरासरी ५५ टक्क्यांपर्यंत आहे. दूध संस्थांची आर्थिक स्थिती चांगली आहे; पण व्याज सवलत योजनेमुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. यासाठीच गटसचिवांनी असहकार आंदोलन केले. साखर कारखानदारीच्या दृष्टीने सरते वर्ष ‘थोडी खुशी, थोडा गम’ असेच राहिले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना होऊन त्यामध्ये खासदार राजू शेट्टी व विक्रमसिंह घाटगे यांचा समावेश करण्यात आला. राज्य शासन व केंद्राच्या मदतीमुळे मागील गळीत हंगाम निसटला. या हंगामात ऊसदराचे आंदोलन नाही; पण केंद्राने मदत न केल्याने कारखानदार पेचात सापडले आहेत. याच वर्षात ‘भोगावती’, ‘बिद्री’च्या कारभाराची चौकशी सुरू झाली. दोन वर्षे प्रलंबित असलेल्या संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. सहकार मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरलाचंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने सहकार, पणनचे कॅबिनेट मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरला मिळाले, हे या वर्षाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.संख्या घटली; सक्षमता आली!गेल्या चार-पाच वर्षांतील मरगळ झटकल्याने सहकारी बॅँकांनी खासगी बँकांना चांगली टक्कर दिली आहे. सहकारी बँकांची संख्या कमी आहे, पण त्यांच्यामध्ये सक्षमता आल्याचे मत बॅँकिंग तज्ज्ञ किरण कर्नाड यांनी व्यक्त केले. --राजाराम लोंढे
‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ची उड्डाणे!
By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST