शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ची उड्डाणे!

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

संख्या घटली; सक्षमता आली!

सरत्या वर्षात ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅँकेने विक्रमी २६०० कोटींचा टप्पा गाठत ‘नाबार्ड’च्या लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला; तर ‘गोकुळ’ने उत्पादकांना भरघोस दूधदर फरक व दूध विक्रीत विक्रम करण्याची किमया केली. तसेच खासगी बॅँकांच्या आव्हानाला सक्षमपणे तोंड देण्याचे काम नागरी सहकारी बॅँकांनी केले आहे. एकंदरीत हे वर्ष सहकाराच्या दृष्टीने दिलासा देणारे ठरले आहे. सहकारातील घडामोडींचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतो. जिल्हा बॅँकेने आर्थिक अरिष्टातून बाहेर पडून तब्बल २६०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला. त्याचबरोबर १२ वर्षे रखडलेल्या ५०० कर्मचाऱ्यांना बढत्या मिळाल्या. ‘नाबार्ड’ने जिल्हा बॅँकेला ‘अ’ वर्ग दर्जा देऊन चांगल्या कामाचे प्रशस्तिपत्र दिले. एकाच वर्षात ‘गोकुळ’ने दोनवेळा दूध दरवाढ करत ४५ कोटींचा फरक देऊन दूध व्यवसायाला बळकटी देण्याचे काम केले. मध्यंतरीच्या पडझडीनंतर जिल्ह्यात ४९ नागरी बॅँका कार्यरत आहेत. बॅँकिंग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खासगी बॅँका स्थापण्याचा सपाटा लावला आहे. त्यात राज्य शासनाचे बॅँकिंग निर्बंध पाहता नागरी बॅँकांनी मल्टीस्टेट मार्ग धरला आहे. खासगी बॅँकांच्या व्याजदरामुळे नागरी बॅँकांकडील कर्जदारांची संख्या कमी होत असून, बॅँकांचा सिडी रेशो सरासरी ५५ टक्क्यांपर्यंत आहे. दूध संस्थांची आर्थिक स्थिती चांगली आहे; पण व्याज सवलत योजनेमुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. यासाठीच गटसचिवांनी असहकार आंदोलन केले. साखर कारखानदारीच्या दृष्टीने सरते वर्ष ‘थोडी खुशी, थोडा गम’ असेच राहिले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना होऊन त्यामध्ये खासदार राजू शेट्टी व विक्रमसिंह घाटगे यांचा समावेश करण्यात आला. राज्य शासन व केंद्राच्या मदतीमुळे मागील गळीत हंगाम निसटला. या हंगामात ऊसदराचे आंदोलन नाही; पण केंद्राने मदत न केल्याने कारखानदार पेचात सापडले आहेत. याच वर्षात ‘भोगावती’, ‘बिद्री’च्या कारभाराची चौकशी सुरू झाली. दोन वर्षे प्रलंबित असलेल्या संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. सहकार मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरलाचंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने सहकार, पणनचे कॅबिनेट मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरला मिळाले, हे या वर्षाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.संख्या घटली; सक्षमता आली!गेल्या चार-पाच वर्षांतील मरगळ झटकल्याने सहकारी बॅँकांनी खासगी बँकांना चांगली टक्कर दिली आहे. सहकारी बँकांची संख्या कमी आहे, पण त्यांच्यामध्ये सक्षमता आल्याचे मत बॅँकिंग तज्ज्ञ किरण कर्नाड यांनी व्यक्त केले. --राजाराम लोंढे