शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

‘गोकुळ’चा कारभार पुन्हा ‘आबाजीं’कडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:43 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची वार्षिक सभा संपल्याने नवीन अध्यक्ष निवडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासाठी संघातील ज्येष्ठ संचालकांनी फिल्डिंंग लावण्यास सुरुवात केली असली तरी आगामी विधानसभेचे राजकारण, संघाच्या दोन्ही नेत्यांशी असलेली जवळीकता पाहता विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांच्याकडेच चौथ्या वर्षी कारभार राहण्याची शक्यता आहे.कोणत्याही सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा झाली, ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची वार्षिक सभा संपल्याने नवीन अध्यक्ष निवडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासाठी संघातील ज्येष्ठ संचालकांनी फिल्डिंंग लावण्यास सुरुवात केली असली तरी आगामी विधानसभेचे राजकारण, संघाच्या दोन्ही नेत्यांशी असलेली जवळीकता पाहता विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांच्याकडेच चौथ्या वर्षी कारभार राहण्याची शक्यता आहे.कोणत्याही सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा झाली, की नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची चर्चा सुरू होते. ‘गोकुळ’मध्येही मागील दोन पंचवार्षिकमधील इतिहास पाहिला, तर प्रत्येक अध्यक्षाला दोन-दोन वर्षांची संधी दिली होती. ९७व्या घटना दुरुस्तीनंतर दरवर्षी न करता पाच वर्षांसाठी अध्यक्ष निवड करण्याची तरतूद आहे. ‘गोकुळ’च्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विश्वास पाटील यांना अध्यक्ष म्हणून संधी दिली. गेले तीन वर्षे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत; त्यामुळे गेल्या वर्षीच अध्यक्ष बदलण्यासाठी काही संचालकांनी हालचाली सुरू केल्या होत्या; पण नेत्यांनी विश्वास पाटील यांच्यावर ‘विश्वास’ व्यक्त केला. गेल्या वर्षभरात विरोधक अधिक आक्रमक झाले. गाय दूध दर कपातीवरून विरोधकांनी मोर्चे काढले, त्यानंतरच्या काळात मल्टिस्टेटचा विषय आक्रमकपणे लावून धरला; पाटील यांनी विरोधकांना बऱ्यापैकी थोपवण्याचा प्रयत्न केला.महाडिक, पी. एन. पाटील यांची पसंती शक्यआता सभा झाल्याने पुन्हा अध्यक्ष निवडीची चर्चा जोर धरू लागली आहे, पाटील यांना तीन वर्षे झाल्याने उर्वरित दोन वर्षांत संधी मिळावी, यासाठी काही ज्येष्ठ संचालक प्रयत्नशील आहेत. त्यातूनच अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांना उपयोगी ठरणाºया नावावर विचार होऊ शकतो. विश्वास पाटील हे पाटील यांच्या करवीर मतदारसंघातील आहेत, त्याचबरोबर ‘कुंभी’च्या राजकारणात ते आमदार चंद्रदीप नरके यांना कडवा विरोध करतात. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील यांनाही त्यांनी अनेकवेळा अंगावर घेतल्याने ते महाडिक यांच्याही पसंतीस राहू शकतात; त्यामुळे पुन्हा विश्वास पाटील हेच ‘गोकुळ’चे कारभारी राहण्याची शक्यता आहे.