शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

देवही बनले शाकाहारी

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

मांसाहारी यात्रांना सुटी : अनिष्ट प्रथा, परंपरांना मूठमाती

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -परिवर्तनाचा ध्यास घेतलेली उचगाव (ता. करवीर) येथील पारधी समाजाची वसाहत. एकेकाळी अनिष्ट प्रथा आणि परंपरांच्या जोखडात अडकलेला हा समाज. मात्र, या वसाहतीतील समाज बांधवांनी लग्न आणि मृत्यूनंतरच्या जाचक रूढी, प्रथा आणि परंपरांना मूठमाती दिली आहे. एवढेच नव्हे, तर वर्षातून चारवेळा देवांच्या यात्रा व्हायच्या. त्याची संख्या आता एका यात्रेवर आणली आहे. यात्रेत देवाला दिला जाणारा मांसाहारी नैवेद्य बंद करून शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणणारी ही पारधी समाजातीलच नव्हे, तर सर्व समाजातील एकमेव वसाहत असावी.या वसाहतीमध्ये वर्षाला कमीत-कमी चार देवांची यात्रा केली जात होती. यात्रेत कोंबडी, बकऱ्यांचा बळी दिला जात होता. प्रत्येक कुटुंबावर यात्रेचा आर्थिक भार पडत होता. मिळविलेले सर्व यात्रेत गमावण्याची वेळ आली. त्यामुळे वसाहतीमध्ये वर्षातून एकदाच शाकाहारी यात्रा करण्याचा निर्णय उचगावचे माजी सरपंच, या समाजाचे मार्गदर्शक गणेश काळे याच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून येथे दुर्गामाताची यात्रा शाहाकारी होत आहे. एकत्रितपणे महाप्रसादाचे वाटप केले जाते. परिणामी खर्चातही बचत होत आहे. अनिष्ट प्रथा-परंपरांना मूठमाती देतानाच समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. नशाबंदी, गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. वर्गणी गोळा न करता गणेशोत्सवकोणाकडूनही वर्गणी गोळा न करता प्रत्येकवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. वायफळ खर्च आणि डॉल्बीला फाटा देऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.मुधोळ संस्थानातून आलेल्या समाजाला सुरुवातीला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागला. चुकीच्या प्रथा, परंपरा बाजूला सारून समाजाला व्यसनाधिनतेच्या विळख्यातून बाजूला काढले. समाजातील काही लोकांमुळे पडलेला गुन्हेगारीचा डाग पुसून लोकसहभागातून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न आहे. समाजातील प्रत्येक कुटुंंब सुखी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - गणेश काळे, मार्गदर्शक वमाजी सरपंच, उचगाव