शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘शतकोटी’चे उद्दिष्ट अपूर्ण

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

आॅगस्टअखेर सुरू राहणार काम

कोल्हापूर : यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील वृक्षारोपणालाही बसला आहे. ७ जुलैला पावसाने सलामी दिल्यानंतर विविध खात्यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणास प्रारंभ केला. त्यामुळे या खात्यांना वृक्षारोपणाचे आपले उद्दिष्ट उद्याप गाठता आले नाही. या खात्यांमार्फत वृक्षारोपणाची मोहीम आॅगस्टअखेर राबविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात ३३ टक्के वनांची निर्मिती करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली आहेत. शासनामार्फत ३३ टक्क्यांच्या उद्दिष्टापर्यंंत पोहोचण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाला पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे ब्रेक लागला. पाऊस उशिरा का सुरू झाला? त्याची कारणे काय? याचे उत्तर आहे प्रचंड वृक्षतोड. एकीकडे शासनाकडून वृक्षारोपणाची जोरदार मोहीम राबविली जात असताना, दुसरीकडे मात्र वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे. विविध औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उद्या, बुधवारी होणाऱ्या वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने नागरिकांबरोबर विविध शासकीय खात्यांनी वृक्षसंवर्धनाच्या सामाजिक जबाबदारीसाठी विडा उचलणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राखीव, संरक्षित, अवर्गीकृत, खासगी संपादित वने असे एकूण १३९१.१९ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण या विभागांबरोबर जिल्हा परिषद, कृषी, उपनिबंधक कार्यालय, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभागांनाही वृक्षारोपणाच्या मोहिमेत शासनाने सहभागी करून घेतले आहे. या विभागांना वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात केवळ प्रादेशिक वन विभागाने ८ लाख २७ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागाकडे इतर विभागांच्या तुलनेत यंत्रणाही मोठी आहे. त्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे इतर विभागांचे उद्दिष्ट मागे पडले आहे. सामाजिक वनीकरणाला दिलेल्या २ लाख ३६ हजारांपैकी केवळ १८ हजार, ‘शतकोटी’चे ८२ लाख ५६ हजार पैकी केवळ १० लाख ८७ हजार इतकेच वृक्षारोपण झाले आहे. या विभागांकडून उर्वरित उद्दिष्ट आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.