शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार उचल द्या--‘शेकाप’ची साखर आयुक्तांकडे मागणी

By admin | Updated: October 29, 2016 00:20 IST

१४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल : शर्मा

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळेच उसाला किमान प्रतिटन ३७०० रुपये अंतिम दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे हातातोंडाशी आलेले ऊस पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे उसाला फटका बसला. उसाची वाढ होऊ शकलेली नाही. परिणामी, यंदा उसाचे उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्के घटणार आहे; त्यामुळे साखर उत्पादनही कमी होणार असून, आगामी काळात साखरेला चांगला भाव मिळू शकतो; पण गेल्या दोन वर्षांची ‘एफआरपी’ सारखीच ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत जातो, त्या पटीत ‘एफआरपी’त वाढ होणे अपेक्षित होते. गतहंगामात प्रतिकूल हवामानामुळे साखर उतारा घटला आहे. परिणामी, सरासरी ‘एफआरपी’मध्ये एक टक्क्याने घट होणार आहे. त्याचा फटका प्रतिटन २४२ रुपये बसणार आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत २० टक्के, तर मुकादमांच्या मजुरीमध्येही अर्धा टक्का वाढ झाली आहे. यामुळे या हंगामात तीन हजार पहिली उचल व ३७०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी ‘शेकाप’चे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार यांनी केली. यावर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे शर्मा यांनी सांगितले. यावेळी संजय डकरे, सरदार पाटील, अंबाजी पाटील, केरबा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)उसाला तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीचे निवेदन ‘शेकाप’च्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. यावेळी संपतराव पवार, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, आदी उपस्थित होते.