शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

तीन हजार उचल द्या--‘शेकाप’ची साखर आयुक्तांकडे मागणी

By admin | Updated: October 29, 2016 00:20 IST

१४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल : शर्मा

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळेच उसाला किमान प्रतिटन ३७०० रुपये अंतिम दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे हातातोंडाशी आलेले ऊस पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे उसाला फटका बसला. उसाची वाढ होऊ शकलेली नाही. परिणामी, यंदा उसाचे उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्के घटणार आहे; त्यामुळे साखर उत्पादनही कमी होणार असून, आगामी काळात साखरेला चांगला भाव मिळू शकतो; पण गेल्या दोन वर्षांची ‘एफआरपी’ सारखीच ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत जातो, त्या पटीत ‘एफआरपी’त वाढ होणे अपेक्षित होते. गतहंगामात प्रतिकूल हवामानामुळे साखर उतारा घटला आहे. परिणामी, सरासरी ‘एफआरपी’मध्ये एक टक्क्याने घट होणार आहे. त्याचा फटका प्रतिटन २४२ रुपये बसणार आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत २० टक्के, तर मुकादमांच्या मजुरीमध्येही अर्धा टक्का वाढ झाली आहे. यामुळे या हंगामात तीन हजार पहिली उचल व ३७०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी ‘शेकाप’चे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार यांनी केली. यावर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे शर्मा यांनी सांगितले. यावेळी संजय डकरे, सरदार पाटील, अंबाजी पाटील, केरबा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)उसाला तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीचे निवेदन ‘शेकाप’च्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. यावेळी संपतराव पवार, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, आदी उपस्थित होते.