शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लाभाची रक्कम थेट घरी देणार

By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST

निराधार योजना : इचलकरंजीतील १०,७४४ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

इचलकरंजी : संजय गांधी निराधार व तत्सम योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या घरी जाऊन लाभाची रक्कम देण्याचा निर्णय येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेतील १०,७४४ लाभार्थ्यांना देण्यात येणारी ६९ लाख रुपयांची रक्कम प्रती महिना बायोमॅटिक पद्धतीने आणि आयसीआयसीआय बॅँकेमार्फत मिळणार आहे.आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी के. बी. देसाई, अव्वल कारकून बाळासाहेब कोळी, पुरवठा निरीक्षक सचिन हाके, राहुल काळे, महेश खेतमर, वरणे, राखी माने, आदी अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरासह चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी व तारदाळ या गावांत २० केंद्रे स्थापून तेथून लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हातात दिली जाईल, असे आमदार हाळवणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. ते म्हणाले, सध्या या योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमार्फत रक्कम दिली जाते. त्यामुळे बॅँकेकडे वृद्ध, अपंग अशा लाभार्थ्यांची गर्दी होते. रक्कम घेण्यासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. तसेच बॅँकेतील रक्कम मिळवून देण्यासाठी काही एजंटही निर्माण झाले आहेत. त्यांना ठरावीक रक्कम द्यायला लागते. असा सर्व प्रकारचा त्रास वाचविण्यासाठी लाभार्थ्यांच्या गावात व परिसरात असलेल्या २० केंद्रांतून ही रक्कम दिली जाईल. तसेच शहरातील ५० हजार ३५९ केसरी शिधापत्रिकाधारकांना पुढील महिन्यापासून दहा किलो गहू व पाच किलो तांदूळ नियमितपणे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. शिधापत्रिकांवरील धान्य मिळणारी दुकाने सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत नियमितपणे उघडली जातील. हयगय करणाऱ्या दुकानांची पुरवठा निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन तपासणी होईल. तसेच नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका आणि विभक्त शिधापत्रिका देण्यासाठी शहरातील सर्व नऊ महा ई- सेवा केंद्रांमध्ये अर्ज भरून घेतले जातील. तशी सुविधा करण्याच्या सूचना तहसीलदारांकडून दिल्या जातील आणि या शिधापत्रिका १५ दिवसांत मिळण्याची सोय केली जाईल, असेही या बैठकीमध्ये निश्चित केले. (प्रतिनिधी)कारवाईचा निर्णयशिवाजी खावट यांच्या पिवळ्या शिधापत्रिकेवर नियमाप्रमाणे युनिट वाढवून न देणाऱ्या दुकानदार दिनकर पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी असलेल्या दुकानांना निरीक्षकांनी नियमितपणे पण अचानक भेटी देऊन तपासणी करावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.