शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

हाक दिली की घटनास्थळी तातडीने हजर१८ वर्षांत ३००० सर्पांना दिले जीवदान

By admin | Updated: August 1, 2014 00:54 IST

सर्पमित्र राजेंद्र कदम यांचा उपक्रम :

भरत बुटाले - कोल्हापूर ,, ‘सापाला जीवदान, समाजाचे प्रबोधन’ हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेली १८ वर्षे राजेंद्र कदम अविरतपणे सर्पमित्राची भूमिका बजावत आहेत. त्यांनी आतापर्यंत नाग, मण्यार (भारतातील अतिशय दुर्मीळ साप), घोणस, दिवड, तस्कर, धामण, हरणटोळ, त्रावणकोर कवड्या, कवड्या, गवत्या, धूळनागीण, आदी अनेक जातींच्या सापांना जीवदान दिले असून, त्यांची संख्या तीन हजारांवर आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे असलेले कदम हातकणंगले औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत सिक्युरिटी आॅफिसर म्हणून काम पाहतात. परिसरातून कुठूनही आणि कोणत्याही वेळी फोन आला की, ते तातडीने स्वखर्चाने जाऊन अंगाला घाम येईपर्यंत ढिगारा, दगड, विटा स्वत:च उपसतात आणि सापाला पकडतात; कारण सापाच्या भीतीने त्यांना कोणीही मदत करीत नाही. पकडलेला साप पिशवीत सुरक्षितपणे ठेवतात आणि वन विभागाला कळवून सुरक्षित स्थळी त्याला सोडतात. संबंधित ज्या घरात, कारखान्यात साप पकडतात, ते साधा चहासुद्धा विचारीत नाहीत; खर्चाचा तर विषयच नाही, इतका वाईट अनुभव येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आजपर्यंत नोकरीसाठी मुंबई, पिंपरी चिंचवड, सांगली; कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली एम.आय.डी.सी. अशा ज्या-ज्या ठिकाणी ते कार्यरत राहिले, तेथे त्यांनी साप पकडून त्यांना सुरक्षित स्थळी सोडले आहे.आतापर्यंत त्यांना दोन वेळा नाग आणि ३० ते ३५ वेळा इतर सापांपासून इजा झाली आहे.थरारक अनुभव...--हातकणंगले येथे एका घराजवळ धामण जातीचे दोन साप पकडताना लोकांच्या गर्दीतून त्यांतील एक निसटला आणि एकच गोंधळ उडाला. सुसाट पळणाऱ्या सापाला त्यांनी दुसऱ्या हाताने तितक्याच चपळतेने पकडले आहे.--असाच अनुभव निमशिरगाव येथे ५० फूट विहिरीतून साप काढताना आला. विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना पाणी कमी असल्याने वर येता येत नव्हते. विहिरीत उडी घेऊन शिताफीने दोन्ही सापांना जीवदान दिले, असेही कदम यांनीसांगितले.आजपर्यंत तीन हजार सापांना जीवदान दिले, त्याचबरोबर जनजागृतीही केली. मात्र, येण्या-जाण्याचा खर्च, वेळ, इजा झाल्यावर औषधपाणी यांबाबत कोणी आजपर्यंत दखलही घेतली नाही, याचेच वाईट वाटते. सापांना जीवदान आणि समाजाचे प्रबोधन करताना मात्र मनाला खूप समाधान वाटते. पण महाराष्ट्र शासनाने या कार्याची दखल घेऊन पाठबळ द्यावे. - राजेंद्र कदम