शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारएवढी तरी मदत द्या

By admin | Updated: March 3, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

सांगली : गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली तेवढी तरी मदत युती शासनाने द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू, ज्वारी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. वारंवार उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याला आता शासनाच्या मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना मी जिल्हा प्रशासनांना नुकसानीच्या पंचनाम्याबाबत स्थायी आदेश दिले होते. सध्याच्या स्थितीत शासनाचे असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे व्हावेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही अवकाळी व अन्य संकटांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर तातडीने मदत दिली होती. आम्ही जेवढी मदत दिली किमान तेवढी तरी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. जादा रक्कम दिली तर चांगली गोष्ट आहे. सिंचन योजनांबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा केली, त्यावेळी पूर्ण विभागासाठी केवळ चार कोटी रुपये मंजूर असल्याचे समजले. टंचाईतून योजनांची वीजबिले भागवून योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषाचा फटका बसू नये. सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित निधीही सरकारकडून मिळेल, अशी आशा आहे. जिल्हा बॅँकेसह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढविण्यासाठी प्रयत्न राहतील. आता दोन निवडणुकांमधून राष्ट्रवादी शहाणी झाली असेल तर, प्रतिसाद काय मिळतो ते पाहू. (प्रतिनिधी)‘तासगाव-कवठेमहांकाळ’ची निवडणूक लढवू नये!तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळाली तर कॉँग्रेसने निवडणूक लढवू नये. त्याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली नसली तरी, आमच्या भावना आम्ही त्यांना कळवू, असे पतंगराव म्हणाले. जिल्ह्याला जिल्हाधिकारी नसल्याने अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत. अवकाळीचे संकट जिल्ह्यावर कोसळले असताना जिल्हाधिकारी नसणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याठिकाणी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी कदम यांनी यावेळी केली.