शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

आघाडी सरकारएवढी तरी मदत द्या

By admin | Updated: March 3, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

सांगली : गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली तेवढी तरी मदत युती शासनाने द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू, ज्वारी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. वारंवार उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याला आता शासनाच्या मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना मी जिल्हा प्रशासनांना नुकसानीच्या पंचनाम्याबाबत स्थायी आदेश दिले होते. सध्याच्या स्थितीत शासनाचे असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे व्हावेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही अवकाळी व अन्य संकटांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर तातडीने मदत दिली होती. आम्ही जेवढी मदत दिली किमान तेवढी तरी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. जादा रक्कम दिली तर चांगली गोष्ट आहे. सिंचन योजनांबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा केली, त्यावेळी पूर्ण विभागासाठी केवळ चार कोटी रुपये मंजूर असल्याचे समजले. टंचाईतून योजनांची वीजबिले भागवून योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषाचा फटका बसू नये. सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित निधीही सरकारकडून मिळेल, अशी आशा आहे. जिल्हा बॅँकेसह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढविण्यासाठी प्रयत्न राहतील. आता दोन निवडणुकांमधून राष्ट्रवादी शहाणी झाली असेल तर, प्रतिसाद काय मिळतो ते पाहू. (प्रतिनिधी)‘तासगाव-कवठेमहांकाळ’ची निवडणूक लढवू नये!तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळाली तर कॉँग्रेसने निवडणूक लढवू नये. त्याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली नसली तरी, आमच्या भावना आम्ही त्यांना कळवू, असे पतंगराव म्हणाले. जिल्ह्याला जिल्हाधिकारी नसल्याने अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत. अवकाळीचे संकट जिल्ह्यावर कोसळले असताना जिल्हाधिकारी नसणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याठिकाणी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी कदम यांनी यावेळी केली.