शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आघाडी सरकारएवढी तरी मदत द्या

By admin | Updated: March 3, 2015 00:30 IST

पतंगराव कदम : अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

सांगली : गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली तेवढी तरी मदत युती शासनाने द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू, ज्वारी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. वारंवार उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याला आता शासनाच्या मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना मी जिल्हा प्रशासनांना नुकसानीच्या पंचनाम्याबाबत स्थायी आदेश दिले होते. सध्याच्या स्थितीत शासनाचे असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे व्हावेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही अवकाळी व अन्य संकटांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर तातडीने मदत दिली होती. आम्ही जेवढी मदत दिली किमान तेवढी तरी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. जादा रक्कम दिली तर चांगली गोष्ट आहे. सिंचन योजनांबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा केली, त्यावेळी पूर्ण विभागासाठी केवळ चार कोटी रुपये मंजूर असल्याचे समजले. टंचाईतून योजनांची वीजबिले भागवून योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषाचा फटका बसू नये. सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित निधीही सरकारकडून मिळेल, अशी आशा आहे. जिल्हा बॅँकेसह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढविण्यासाठी प्रयत्न राहतील. आता दोन निवडणुकांमधून राष्ट्रवादी शहाणी झाली असेल तर, प्रतिसाद काय मिळतो ते पाहू. (प्रतिनिधी)‘तासगाव-कवठेमहांकाळ’ची निवडणूक लढवू नये!तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळाली तर कॉँग्रेसने निवडणूक लढवू नये. त्याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली नसली तरी, आमच्या भावना आम्ही त्यांना कळवू, असे पतंगराव म्हणाले. जिल्ह्याला जिल्हाधिकारी नसल्याने अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत. अवकाळीचे संकट जिल्ह्यावर कोसळले असताना जिल्हाधिकारी नसणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याठिकाणी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी कदम यांनी यावेळी केली.