शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सत्ता द्या; महाराष्ट्र टोलमुक्त करू --महाराष्ट्रात प्रगतीसाठी राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही.

By admin | Updated: October 13, 2014 00:38 IST

सुप्रिया सुळे यांचे आवाहन

 कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजकारणाला महत्त्व देणारा आहे, दिलेला ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आमच्याकडे असल्याने महाराष्ट्रात एकहाती सत्ता द्या, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करू, त्याची सुरुवात कोल्हापुरातूनकेली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरात दिली. राष्ट्रवादीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रारंभप्रसंगी अजित पवार यांनी शंभर दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे अभिवचन दिले आहे. आम्ही दिलेले वचन पाळणारी मंडळी असल्याने आमच्याबरोबर विश्वासाचे नाते आहे. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातून टोल घालविला जाईल. पाणी, महिलांच्या प्रश्नांसह सुरक्षित महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. द्रष्टे नेते राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत आर. के. पोवार यांचासारखा निष्ठावंत कार्यकर्ता लढत आहे, त्यांना साथ द्या. कोल्हापूर शहरातील प्रश्न कोणी मार्गी लावावेत, याची जाणीव येथील जनतेला आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काही मंडळी उलटसुलट बोलत आहेत, पण ज्यांनी विधिमंडळात चहा पिण्यासाठी व जांभया देण्यासाठी असे दोन वेळाच तोंड उघडले ती मंडळी कोल्हापूरचा काय विकास करणार, अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गेले ३५ वर्षे सामान्य माणूस म्हणून कोल्हापूर शहरात काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता दिली पण कोणाकडे खंडणी मागितली नाही. जमेल तसे सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले असून आता पक्षाची शहरात मोठी ताकद आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे आर. के. पोवार यांनी सांगितले. नगरसेवक राजू लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला माजी महापौर सुनीता राऊत, कादंबरी कवाळे, पद्मा तिवले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, परिक्षित पन्हाळकर, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. आदिल फरास यांनी आभार मानले.

परिवर्तनाच्या लढाईत यड्रावकरांचा विजय---सुप्रिया सुळे यांचा विश्वास : जयसिंगपूर येथे जाहीर सभा

जयसिंगपूर : महाराष्ट्रात प्रगतीसाठी राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही. सहकारी, शिक्षण संस्थांबरोबरच जयसिंगपूरच्या विकासासाठी ८० कोटीचा निधी कर्तृत्वाच्या जोरावर खेचून आणणाऱ्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना साथ देण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या या लढाईत शिरोळची जनता यड्रावकरांना निश्चित विजयी करेल, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. खा. सुळे पुढे म्हणाल्या, कठीण प्रसंगात देशाचे नेते शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रातील मोजकीच माणसे उभी राहिली, त्यामध्ये यड्रावकर कुटूंबाचा समावेश होता. शरद पवार यांच्यावर टिका केल्याशिवाय काहींंचा पक्षच चालत नाही, विरोधक हा दिलदार असावा तो रिकामटेकडा नसावा अशी टिका खा. शेट्टी यांचे नाव न घेता त्यांनी केली. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील-यड्रावकर यांच्या विचाराचा व कार्याचा वारसा जोपासून कायमपणे समाजासाठी नाळ जोडून ठेवली आहे. तालुक्याला बदल हवा आहे, जनतेला काम करणाऱ्या माणसाची गरज आहे, असे सांगून यड्रावकर पुढे म्हणाले, तालुक्यात अडीचशे कॉटचे रूग्णालय सुरू करून मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे. प्रारंभी स्वागत नगराध्यक्षा सुनिता खामकर यांनी केले. प्रस्ताविक प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी केले. सभेस चंगेजखान पठाण, राजेंद्र मालू, रावसाहेब भिलवडे, अमरसिंह पाटील, आदी उपस्थित होता. त्यांच्या मनातही घड्याळ राजकीय वारसदार म्हणून जाहीर करणारे केवळ पक्षाच्या धोरणाप्रमाणे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या मनात घड्याळ आहे, कॉँग्रेसची मते ही राष्ट्रवादीलाच मिळतील असा टोला आ. सा. रे. पाटील यांचे नाव न घेता खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्यांच्या मनातही घड्याळ राजकीय वारसदार म्हणून जाहीर करणारे केवळ पक्षाच्या धोरणाप्रमाणे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या मनात घड्याळ आहे, कॉँग्रेसची मते ही राष्ट्रवादीलाच मिळतील असा टोला आ. सा. रे. पाटील यांचे नाव न घेता खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला.