शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

भाताला १४०० हमीभाव द्या : शेट्टी

By admin | Updated: November 10, 2014 00:47 IST

दुसरी भात परिषद : चारशेच्या बोनसचीही मागणी

बांबवडे : चालू हंगामात भाताला १३६० ते १४०० रुपयांचा हमीभाव व ४०० रुपये बोनस मिळावा, तसेच शेतकरी मागतील त्या ठिकाणी शासकीय भात खरेदी केंद्र उभारण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे दुसऱ्या भात परिषदेमध्ये ठरावाद्वारे केली.प्रारंभी सुरेश म्हासरकर यांनी स्वागत केले. विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, पहिल्या भात परिषदेचा परिणाम म्हणजे केवळ सरकारच्या धोरणानुसार गेल्या वर्षी १३१० रु. हमीभाव व २०० रु. बोनस असा १५१० रु. प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. दुसऱ्या भात परिषदेमध्ये १३६० ते १४०० रु. हमीभाव व ४०० रु. बोनस तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, असे ठराव उद्याच्या अधिवेशनात ठेवून आमच्या ठरावाचे काय करताय, हे विचारणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.भातपिकाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शेती सोडून चाकरमाने म्हणून मुंबईला जावे लागते. त्यांच्या हाताला काम मिळायचे असेल तर विविध पिकांवर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग येथेच उभा राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, असेही शेट्टी म्हणाले. विधानसभेतील अपयशाबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे पराभूत होतात; मात्र शेतकऱ्यांसाठी चकार शब्दही न काढणारे विजयी होतात. ही मानसिकता लोकांनी आता बदलावी म्हणजे सत्तेसाठी दुकानदारी मांडणाऱ्या राजकारण्यांना चाप बसेल.प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न बोलणाऱ्या नेत्यांवर टीका करताना, सर्व रोगांवर एखादा रामबाण उपाय असतो, तसे कापूस, भात, कांदा, ऊस असो की शाहूवाडीतील बॉक्साईट असो, सर्वांना योग्य न्याय मिळायचा असेल तर राजू शेट्टी यांनी आंदोलन करून जेलमध्ये जावे. म्हणजे सर्व पिकांना आपोआप रास्त भाव मिळतो. मग असे असेल तर संघटनेचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायची वेळ आल्यावर तुम्ही माघारी का असता, असा जाब विचारून, जर हे विधानसभेत गेले तर आमच्यासाठी कोण भांडणार, असा प्रश्न तुम्हाला पडत असला, तर निवडून दिले तरी आणि नाही दिले तरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी अमरसिंह पाटील, प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावार, जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, वसंत पाटील, भगवान काटे, बाळासो कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्या शीला पाटील, सागर शंभूशेटे, तुकाराम खुटाळे, गोरक्ष पाटील, अनिल पाटील, बबन माने, जयसिंग पाटील, भीमराव पाटील, अमोल महाजन, आदी उपस्थित होते. कारखानदार अस्वस्थदरवर्षी संघटना आंदोलन करते, त्याचा फायदा कारखान्यांना होतो. सरकार अनुदान जाहीर करते. आता संघटना गप्प आहे आणि सरकार आपल्याला अनुदान देणार नाही म्हणून कारखानदार अस्वस्थ झाले आहेत, परंतु आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या २५ तारखेला पुणे साखर आयुक्तालयावर मोर्चा निघणार असल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला.सरकारच्या माध्यमातून दबावदरवर्षी सरकारच्या माध्यमातून संघटनेवर दबाव टाकला जायचा. आता सरकार आमचे आहे. आम्ही कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना गुडघे टेकायला लावू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.श्सळीतून भाकरी व नळीतून भाजीआमचे चार-सहा आमदार जरी निवडून आले असते, तरी पवार काका-पुतण्यांना सळीतून भाकरी व नळीतून भाजी आम्ही निश्चितच दिली असती, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.