शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या विकासासाठी एकवेळ संधी द्या

By admin | Updated: October 24, 2015 01:08 IST

एकनाथ खडसे : महायुतीची कोपरा सभा; नरेंद्र मोदींचे पारदर्शक कारभाराचे आश्वासन पाळले

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या जनताभिमुख अनेक योजना आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायच्या असतील आणि शहराचा विकास साधायचा असेल तर कोल्हापूर महापालिकेत महायुतीस एकवेळ संधी द्या, असे प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. रंकाळा टॉवर येथे शुक्रवारी रात्री महायुतीच्या आठ उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. खडसे म्हणाले, केवळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असून चालत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेने कोणत्याही योजनेस हिरवा कंदील अर्थात राबविण्याची तयारी दाखविली तरच केंद्राच्या लोकाभिमुख योजना खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन कोल्हापूर महापालिकेत एकवेळ संधी द्या. या संधीमध्ये आम्ही गुंठेवारीचा प्रश्न निकालात काढू. अल्पसंख्याक समाजासाठीही अनेक योजना आहेत. त्या राबवून या समाजातील नागरिकांचाही विकास करू. कायमची टोलमुक्ती हवी असेल तर आम्हाला निवडून द्या. एक वर्षापूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर काय होते आणि आज काय दर आहेत? डाळींचे वाढलेले दरही एक महिन्यात पूर्वीसारखेच करू. काँग्रेसच्या राज्यात प्रत्येक महिन्याला एका मंत्र्याचे घोटाळे उघडकीस येत होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कारभाराचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यात आम्हीही पाळले आहे. काँग्रेसच्या राजवटीत मुलगा, मुलगी अथवा रक्ताच्या नात्यातील नातेवाइकांना एखादी संपत्ती बक्षीस म्हणून द्यायची असेल तर संपत्तीच्या चार टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होता. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर केवळ २०० रुपयांच्या स्टॅम्पवर संपत्ती वर्ग केली जात आहे. येत्या काही दिवसांत कोल्हापूरच्या विमानतळाचाही प्रश्न निकाली काढू. टोल आणि एलबीटी कोणामुळे लागला, याचाही विचार जनतेने करावा. अर्धकुशल, दहावी नापास, पदवीधरांना केंद्राच्या स्किल योजनेतून १० लाखांचे विनातारण कर्ज देऊन खऱ्या अर्थाने बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही खडसे यांनी दिली. ताराराणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम, भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार सुभाष देशमुख, पुंडलिक जाधव यांच्यासह अजित ठाणेकर, हेमंत कांदेकर, रचना मोरे, मीनाक्षी मेस्त्री, वैशाली पाटील, शेखर कुसाळे, प्रियांका इंगवले, अमोल पालोजी हे भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. उद्योग विस्तारासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उपनगरातील जनतेसाठी आमची सत्ता आल्यास रुग्णालये, नाट्यगृह, महापालिकेचे विभागीय कार्यालय स्थापन करून जनतेची खऱ्या अर्थाने सोय करू. याशिवाय विमानतळाचा प्रश्नही येत्या दोन महिन्यांत मार्गी लावला जाईल. त्यामुळे देशातील अनेक उद्योजक कोल्हापुरात उद्योग विस्तारासाठी येतील. याकरिता महायुतीच्या ४१ पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.