शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दिशाभूल करणाऱ्यांना ‘दणका’ द्या

By admin | Updated: March 19, 2015 00:13 IST

सतेज पाटील : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी कसबा बावड्यात मेळावा

कसबा बावडा : साखर उद्योग अडचणीत असल्याचे प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकीकडे तुणतुणे वाजवायचे, तर दुसरीकडे मात्र बेडकीहाळ, नागपूर अशा ठिकाणी खासगी साखर कारखाने उभे करून सभासदांची दिशाभूल करायची. अशा दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात सर्व सभासद शेतकऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने हातात काठी घेऊन दणका देण्याची संधी आली आहे. त्यांनी ती गमावू नये, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल’च्या मेळाव्यात ते बोलत होते. श्रीराम सोसायटीच्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यास राधानगरी, हातकणंगले, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते. पाटील म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे म्हणून सांगतात. मग कारखान्यास आॅडिट वर्ग ‘ब’ कशासाठी? याचा खुलासा करावा. सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या या कारखान्याचा कारभार खरोखरच सभासदाभिमुख आहे का? असा सवाल करत या कारखान्याला कोणतेही पाळीपत्रक नाही. सभासदांचा ऊस उशिरा नेला जातो, असा आरोप केला. गेली १५ वर्षे कारखान्यात असाच मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सभासदांचा हा कारखाना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.यावेळी कारखान्याचे माजी चेअमन विश्वास नेजदार म्हणाले की, कारखान्यात महाडिक कंपनीने मनमानी कारभार करून पैसा कमावला आहे. बाहेरील भागातील कमी रिकव्हरीचा ऊस आणून कारखान्याचे नुकसान केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शहाजी पाटील (लाटवडे), राजेंद्र बेनाडे (रुई), विश्वास काटकर (पोहाळे), पंडित लाड (निगवे दुमाला), के. डी. नलवडे (धामोड), उत्तम पाटील (निगवे), महेश चव्हाण (पुलाची शिरोली), गोरे गुरुजी (कसबा तारळे), अ‍ॅड. प्रल्हाद लाड (कसबा बावडा) यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शशिकांत खवरे, बाळासो निकम, पूनम जाधव, दत्तू पाटील, लीला धुमाळ, फक्कडराव मुधाळे, बाबासो चौगले, ऋतुराज पाटील, जयसिंग ठाणेकर यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.‘गोकुळ’मध्ये जास्तीचा दर देणार‘गोकुळ’ची निवडणूकही ताकदीनिशी लढवणार आहे. ‘गोकुळ’च्या उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी सतेज पाटील यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला. चांगल्या दुधात पाणीकारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगल्या रिकव्हरीचा ऊस असताना महाडिकांकडून कमी रिकव्हरीचा ऊस बाहेरुन आणला जातो. त्यामुळे सरासरी साखर उतारा कमी येतो. हा प्रकार म्हणजे शुद्ध दुधात भेसळीसाठी पाणी घातल्याचा प्रकार असल्याचे नेजदार म्हणाले.