शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दिशाभूल करणाऱ्यांना ‘दणका’ द्या

By admin | Updated: March 19, 2015 00:13 IST

सतेज पाटील : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी कसबा बावड्यात मेळावा

कसबा बावडा : साखर उद्योग अडचणीत असल्याचे प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकीकडे तुणतुणे वाजवायचे, तर दुसरीकडे मात्र बेडकीहाळ, नागपूर अशा ठिकाणी खासगी साखर कारखाने उभे करून सभासदांची दिशाभूल करायची. अशा दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात सर्व सभासद शेतकऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने हातात काठी घेऊन दणका देण्याची संधी आली आहे. त्यांनी ती गमावू नये, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल’च्या मेळाव्यात ते बोलत होते. श्रीराम सोसायटीच्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यास राधानगरी, हातकणंगले, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते. पाटील म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे म्हणून सांगतात. मग कारखान्यास आॅडिट वर्ग ‘ब’ कशासाठी? याचा खुलासा करावा. सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या या कारखान्याचा कारभार खरोखरच सभासदाभिमुख आहे का? असा सवाल करत या कारखान्याला कोणतेही पाळीपत्रक नाही. सभासदांचा ऊस उशिरा नेला जातो, असा आरोप केला. गेली १५ वर्षे कारखान्यात असाच मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सभासदांचा हा कारखाना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.यावेळी कारखान्याचे माजी चेअमन विश्वास नेजदार म्हणाले की, कारखान्यात महाडिक कंपनीने मनमानी कारभार करून पैसा कमावला आहे. बाहेरील भागातील कमी रिकव्हरीचा ऊस आणून कारखान्याचे नुकसान केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शहाजी पाटील (लाटवडे), राजेंद्र बेनाडे (रुई), विश्वास काटकर (पोहाळे), पंडित लाड (निगवे दुमाला), के. डी. नलवडे (धामोड), उत्तम पाटील (निगवे), महेश चव्हाण (पुलाची शिरोली), गोरे गुरुजी (कसबा तारळे), अ‍ॅड. प्रल्हाद लाड (कसबा बावडा) यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शशिकांत खवरे, बाळासो निकम, पूनम जाधव, दत्तू पाटील, लीला धुमाळ, फक्कडराव मुधाळे, बाबासो चौगले, ऋतुराज पाटील, जयसिंग ठाणेकर यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.‘गोकुळ’मध्ये जास्तीचा दर देणार‘गोकुळ’ची निवडणूकही ताकदीनिशी लढवणार आहे. ‘गोकुळ’च्या उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी सतेज पाटील यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला. चांगल्या दुधात पाणीकारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगल्या रिकव्हरीचा ऊस असताना महाडिकांकडून कमी रिकव्हरीचा ऊस बाहेरुन आणला जातो. त्यामुळे सरासरी साखर उतारा कमी येतो. हा प्रकार म्हणजे शुद्ध दुधात भेसळीसाठी पाणी घातल्याचा प्रकार असल्याचे नेजदार म्हणाले.