शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

जमीन द्या, कॉरिडॉर घ्या

By admin | Updated: September 22, 2016 01:09 IST

सुभाष देसाई यांची सूचना : मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळलेले नाही; लोकप्रतिनिधी, उद्योजकांशी मुंबईत चर्चा

सतीश पाटील ल्ल शिरोली मुंबई-बंगलोर कॉरिडॉरसाठी कऱ्हाड ते कागल दरम्यान सुमारे चार हजार एकर जमीन लागेल. ही जमीन जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि उद्योजकांनी एकत्र येऊन उपलब्ध करून दिली, तर कॉरिडॉरबाबत कोणतीही अडचण नाही. कॉरिडॉरचा अजून कोणताही मार्ग निश्चित झालेला नाही. शिवाय कोल्हापूरला वगळले असे काही नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी मुंबईत सांगितले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योगमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यात कॉरिडॉरबाबत सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी प्रारंभी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील यांची उद्योगमंत्र्यांबरोबर बैठक झाली. यामध्ये सर्वच आमदारांनी मुंबई-बंगलोर कॉरिडॉर आणि कऱ्हाड-बेळगांव रेल्वेमार्ग हे कोल्हापुरातून जावेत, अशी मागणी केली. त्यानंतर उद्योजकीय संघटनांच्या बैठकीत शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूरला शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित या तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, याठिकाणी कोणताही मोठा उद्योग नाही. कॉरिडॉरच्या (पान १ वरून) माध्यमातून मोठे उद्योग येतील. त्यामुळे कॉरिडॉर हा कोल्हापुरातून जावा, अशी मागणी केली. गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी ‘फायर’च्या जाचक अटींमुळे उद्योजक अडचणीत आले आहेत या अटी रद्द कराव्यात, अशी मागणी केली. त्यावर उद्योगमंत्री देसाई यांनी दोन्ही बैठकीत मुंबई-बंगलोर कॉरिडॉर कुठून जाणार याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कऱ्हाड ते कागल हा हरितपट्टा आहे. त्यातील केवळ कोल्हापुरातून चार हजार एकर जमीन लागणार आहे. हा कॉरिडॉर जर कोल्हापूर परिसरातून गेला, तर निश्चितच आनंद होईल. मात्र, यामध्ये जमिनीची मुख्य अडचण आहे. कॉरिडॉरसाठी प्रचंड जमीन लागते. त्यामुळे प्रतिसाद मिळेल, तिथे संपादन केले जाते. कोल्हापूरलाही कॉरिडॉर हवा असल्यास त्यासाठी आवश्यक जमीन कोल्हापूरकरांनी देण्याचे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. औरंगाबाद येथे चार हजार हेक्टर जमीन ताब्यात आहे. परिसरातील आणखी शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत. त्याची तुलना येथे होऊ शकत नाही. त्याची प्रत, प्रत्यक्ष वापर आणि कोल्हापुरातील जमीन यात जमीन-आस्मानचा फरक आहे. येथे चांगली शेती होते. ही शेती नासवून उद्योगाला जमीन कोण देईल? लागवडीखाली असलेली जमीन इतर प्रयोजनासाठी घ्यायची नाही, हे सरकारचे धोरण आहे तरीही स्वेच्छेने कुणी तयार असेल तर ती जमीन घेण्याची तयारी आहे. योग्य दर तसेच संमतीनेच जमीन संपादित केली जाईल. यासाठी जनजागृती आवश्यक असून त्यासाठी सर्वांचेच सहकार्य लागणार आहे. त्यामुळे विरोध होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि उद्योजकांनी एकत्र येऊन जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. या बैठकीस उद्योग सचिव अपूर्वा चंद्रा, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष राजू पाटील, फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष संजय जोशी, गोरख माळी, हरिषचंद्र धोत्रे, वाय. व्ही. पाटील, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विभागाचे प्रमुख विक्रम पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) चार हजार एकर जमीन दिल्यास सकारात्मक विचार कॉरिडॉरसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे शासनाने कोल्हापूरमधूनच कॉरिडॉर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे यावेळी केली. त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात एकत्रित अशी चार हजार एकर जागा उपलब्ध असेल, तर कॉरिडॉर प्रकल्प कोल्हापुरात आणण्याबाबत केंद्र सरकारकडे राज्य शासन आग्रही भूमिका मांडून सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या लोकप्रतिनिधींना दिली. जमिनीसाठी घेणार आठवडाभरात बैठक कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागाबाबत शासन सकारात्मक असल्याचे उद्योगमंत्र्यांशी बुधवारी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाल्याचे ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, त्यांच्या सूचनेनुसार कॉरिडॉरसाठी लागणारी सुमारे चार हजार एकर जमिनीच्या निश्चितीबाबत आठवड्याभरात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. प्राथमिक स्वरूपात जमीन निश्चित केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. ‘फायर’बाबत समिती पाहणी करेल ‘फायर’च्या अटींबाबत झालेल्या मागणीनुसार एक समिती नेमण्यात येईल. तसेच संबंधित समिती कोल्हापूरला येऊन पाहणी करेल. त्यानंतर ‘फायर’बाबतच्या जाचक अटी रद्द करू, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी उद्योजकांना दिले . प्रलंबित प्रश्नांवर चर्चाच नाही कोल्हापूरमधील उद्योगांचे आणि उद्योजकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. वीज दरवाढ, टाऊनशीप, व्हॅट परतावा, मेक इन इंडिया, वेस्ट सँड, ईएसआयसी यासारख्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, या बैठकीत ती झालीच नाही.