शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पालिकेला ‘क’ वर्ग दर्जा द्या

By admin | Updated: September 10, 2014 23:55 IST

महासभेचा ठराव : खासगी जागेसाठी रंकाळ्याचा सांडवा बदलणार

कोल्हापूर : शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी मिळावा, यासाठी राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेला ‘विशेष बाब’ म्हणून ‘ड’ ऐवजी ‘क’ दर्जा द्यावा. महालक्ष्मी देवस्थानाच्या आधारे राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा, असा ठराव आज, बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत करण्यात आला. टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटच्या आरक्षणात बदल व खासगी जागामालकांच्या फायद्यासाठी रंकाळ्याच्या सांडव्यात बदल करण्याचा निर्णयही सभागृहाने घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.शहराच्या हद्दवाढीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याचे समजते, याबाबत प्रशासनास शासनाने काही आदेश पाठविला आहे का? अशी विचारणा निशिकांत मेथे यांनी केली. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी अशाप्रकारचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी संपूर्ण सभागृहाने केली.हद्दवाढीचा प्रश्न रखडल्यानेच शहराच्या लोकसंख्येत वाढ होऊ शकत नाही. लोकसंख्येच्या निकषांवरच महापालिकेचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे वर्गीकरण केले जाते. नाशिक व नागपूर शहराची लोकसंख्या कमी असतानाही ‘विशेष बाब’ म्हणून पुढील वर्गवारीत समावेश करण्यात आला. महालक्ष्मी देवस्थानच्या धर्तीवर राज्य शासनानेही कोल्हापूरचा ‘क’ वर्गवारीत समावेश करावा, अशा मागणीचा ठराव महासभेत करण्यात आला. (प्रतिनिधी)खासगी मालकाचा फायदारंकाळ्याशेजारील एका खासगी जमीनमालकाच्या फायद्यासाठी विकास योजनेतील १८ मीटरचा रस्ता रद्द करून रंकाळ्याच्या सांडव्यात फेरबदल करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. मागील तीन सभेत हा विषय नामंजूर करण्यात आला होता. नेत्यांच्या दबावामुळेच सभागृहाने विषयास मंजुरी दिल्याची महापालिकेत चर्चा आहे.आरक्षण बदलास सुरुवातटेंबलाईवाडी येथील सर्व्हे नं. २३ व २४/२ या जागेवर असणारे टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द करत रहिवासी विभागात या जागेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू करताना जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षणात बदल केला जाणार नाही, अशी भीमगर्जना केली होती. मात्र, सभागृहाने नागरिकांचे हित पुढे करत आरक्षण उठविण्यास सुरुवात केली. येथील रहिवाशांना गुंठेवारी नियमितीकरण सोपे जावे, यासाठीच हा बदल केल्याचा खुलासा उपमहापौर मोहन गोंजारे यांनी केला आहे. असे असले तरी येथून पुढे अशाच रहिवासी व नागरिकांच्या हिताचे कारण पुढे करून अनेक जागांवरील आरक्षण हटविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.