शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कोल्हापूर पालिकेला ‘क’ वर्ग दर्जा द्या

By admin | Updated: September 10, 2014 23:55 IST

महासभेचा ठराव : खासगी जागेसाठी रंकाळ्याचा सांडवा बदलणार

कोल्हापूर : शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी मिळावा, यासाठी राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेला ‘विशेष बाब’ म्हणून ‘ड’ ऐवजी ‘क’ दर्जा द्यावा. महालक्ष्मी देवस्थानाच्या आधारे राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा, असा ठराव आज, बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत करण्यात आला. टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटच्या आरक्षणात बदल व खासगी जागामालकांच्या फायद्यासाठी रंकाळ्याच्या सांडव्यात बदल करण्याचा निर्णयही सभागृहाने घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.शहराच्या हद्दवाढीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याचे समजते, याबाबत प्रशासनास शासनाने काही आदेश पाठविला आहे का? अशी विचारणा निशिकांत मेथे यांनी केली. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी अशाप्रकारचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी संपूर्ण सभागृहाने केली.हद्दवाढीचा प्रश्न रखडल्यानेच शहराच्या लोकसंख्येत वाढ होऊ शकत नाही. लोकसंख्येच्या निकषांवरच महापालिकेचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे वर्गीकरण केले जाते. नाशिक व नागपूर शहराची लोकसंख्या कमी असतानाही ‘विशेष बाब’ म्हणून पुढील वर्गवारीत समावेश करण्यात आला. महालक्ष्मी देवस्थानच्या धर्तीवर राज्य शासनानेही कोल्हापूरचा ‘क’ वर्गवारीत समावेश करावा, अशा मागणीचा ठराव महासभेत करण्यात आला. (प्रतिनिधी)खासगी मालकाचा फायदारंकाळ्याशेजारील एका खासगी जमीनमालकाच्या फायद्यासाठी विकास योजनेतील १८ मीटरचा रस्ता रद्द करून रंकाळ्याच्या सांडव्यात फेरबदल करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. मागील तीन सभेत हा विषय नामंजूर करण्यात आला होता. नेत्यांच्या दबावामुळेच सभागृहाने विषयास मंजुरी दिल्याची महापालिकेत चर्चा आहे.आरक्षण बदलास सुरुवातटेंबलाईवाडी येथील सर्व्हे नं. २३ व २४/२ या जागेवर असणारे टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द करत रहिवासी विभागात या जागेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू करताना जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षणात बदल केला जाणार नाही, अशी भीमगर्जना केली होती. मात्र, सभागृहाने नागरिकांचे हित पुढे करत आरक्षण उठविण्यास सुरुवात केली. येथील रहिवाशांना गुंठेवारी नियमितीकरण सोपे जावे, यासाठीच हा बदल केल्याचा खुलासा उपमहापौर मोहन गोंजारे यांनी केला आहे. असे असले तरी येथून पुढे अशाच रहिवासी व नागरिकांच्या हिताचे कारण पुढे करून अनेक जागांवरील आरक्षण हटविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.