शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘मातीचे हेल्थ कार्ड’ देणार

By admin | Updated: December 28, 2016 01:06 IST

राधामोहन सिंह : सिद्धगिरी मठावर किसान समृद्धी शिबिर

कोल्हापूर : आपण शेतीला जमिनीचा तुकडा नाही, तर आई मानतो. या आईरूपी शेतीचे आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच तिचा मुलगा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना येत्या वर्षात मातीचे हेल्थ कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी येथे दिली.कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठ येथे आयोजित केलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप गोवंश विकास, पंचायत राजचे राष्ट्रीय संघटक हृदयनाथ सिंह होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, खासदार कुुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल, भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपाल सिंह तोमर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री अण्णा डांगे प्रमुख उपस्थित होते. कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले, ‘शाश्वत शेतीसाठी माती तपासणीसह तिचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकार कार्यरत आहे. याअंतर्गत आगामी वर्षात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने घेऊन त्यांना माती हेल्थ कार्ड दिले जाईल. आतापर्यंत सुमारे दीड लाख माती नमुन्यांची तपासणी करून अश्ी कार्डे दिली आहेत. मार्च अखेरपर्यंत दोन कोटी २९ लाख जणांना अशी कार्डे दिली जातील. देशात शाश्वत, जैविक, सेंद्रिय, परंपरागत आणि गो-पालन आधारित शेती करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ५९७ कोटी खर्चाचे ‘उन्नत भारत अभियान’ सरकारने हाती घेतले आहे. ५० एकरांचा एक क्लस्टर असे दहा हजार क्लस्टर बनविण्याची योजना आहे. आतापर्यंत देशात ९११८ क्लस्टरचे काम झाले आहे. कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. गोपालजी यांनी सूत्रसंचालन केले. आमदार अमल महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लखपती शेती’देशभर राबविणारसिद्धगिरी मठाने साकारलेला ‘लखपती शेती’ हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा आहे. केंद्र सरकारतर्फे पहिल्या टप्प्यात हा उपक्रम देशातील १०० गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, शेतीमधून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. शिवाय शेतीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, वृक्षारोपण, देशी गार्इंचे संवर्धन व दूधवृद्धीसाठी गोकुळ मिशन व गोकुळ ग्राम, सेंद्रीय शेती प्रमाणीकरण, आदी उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. दरम्यान, मंत्री राधामोहन सिंग यांनी सिद्धगिरी मठाच्या लखपती शेती प्रकल्प, सौरशक्ती निर्जलीकरण कुटी व प्राकृतिक शीतकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात देशभरातील सुमारे २५० शेतकरी सहभागी झाले होते. त्यांना या शिबिरात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.