शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना ‘मातीचे हेल्थ कार्ड’ देणार

By admin | Updated: December 28, 2016 01:06 IST

राधामोहन सिंह : सिद्धगिरी मठावर किसान समृद्धी शिबिर

कोल्हापूर : आपण शेतीला जमिनीचा तुकडा नाही, तर आई मानतो. या आईरूपी शेतीचे आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच तिचा मुलगा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना येत्या वर्षात मातीचे हेल्थ कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी येथे दिली.कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठ येथे आयोजित केलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप गोवंश विकास, पंचायत राजचे राष्ट्रीय संघटक हृदयनाथ सिंह होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, खासदार कुुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल, भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपाल सिंह तोमर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री अण्णा डांगे प्रमुख उपस्थित होते. कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले, ‘शाश्वत शेतीसाठी माती तपासणीसह तिचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकार कार्यरत आहे. याअंतर्गत आगामी वर्षात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने घेऊन त्यांना माती हेल्थ कार्ड दिले जाईल. आतापर्यंत सुमारे दीड लाख माती नमुन्यांची तपासणी करून अश्ी कार्डे दिली आहेत. मार्च अखेरपर्यंत दोन कोटी २९ लाख जणांना अशी कार्डे दिली जातील. देशात शाश्वत, जैविक, सेंद्रिय, परंपरागत आणि गो-पालन आधारित शेती करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ५९७ कोटी खर्चाचे ‘उन्नत भारत अभियान’ सरकारने हाती घेतले आहे. ५० एकरांचा एक क्लस्टर असे दहा हजार क्लस्टर बनविण्याची योजना आहे. आतापर्यंत देशात ९११८ क्लस्टरचे काम झाले आहे. कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. गोपालजी यांनी सूत्रसंचालन केले. आमदार अमल महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लखपती शेती’देशभर राबविणारसिद्धगिरी मठाने साकारलेला ‘लखपती शेती’ हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा आहे. केंद्र सरकारतर्फे पहिल्या टप्प्यात हा उपक्रम देशातील १०० गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, शेतीमधून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. शिवाय शेतीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, वृक्षारोपण, देशी गार्इंचे संवर्धन व दूधवृद्धीसाठी गोकुळ मिशन व गोकुळ ग्राम, सेंद्रीय शेती प्रमाणीकरण, आदी उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. दरम्यान, मंत्री राधामोहन सिंग यांनी सिद्धगिरी मठाच्या लखपती शेती प्रकल्प, सौरशक्ती निर्जलीकरण कुटी व प्राकृतिक शीतकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात देशभरातील सुमारे २५० शेतकरी सहभागी झाले होते. त्यांना या शिबिरात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.