शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या :राष्ट्रवादी

By admin | Updated: June 10, 2017 15:54 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १0 : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन बळीराजा सनद‘ स्वरुपात शनिवारी प्रभारी निवास उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांना देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरीही केंद्र व राज्य सरकार याकडे गांभिर्याने पाहात नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय त्याला नव्या हंगामासाठी शेती करणे अशक्य आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचे पडलेले भाव, सततचा अवकाळी पाऊस गारपिटीमुळे होणारे नुकसान भरुन काढणे अवघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बळीराजाची अवस्था गंभीर झाली आहे. यासाठी ‘बळीराजाची सनद’ स्वरुपात मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे.

स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करुन किफायतशीर व सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा, बि-बियाणे, खते व औषधांचा पुरवठा शासनामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर उपलब्ध करुन द्यावे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान तीन लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट शून्य व्याजदराने द्यावे, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, किसन चौगुले, पंडितराव केणे, मुकुंद देसाई, बी.एन.पाटील-मुगळीकर, संगीता खाडे आदींचा समावेश होता.

स्वाभिमानी सप्ताह सुरु

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडुन आलेली बळीराजाची सनद जिल्हाध्यक्ष मा ए वाय पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर बिंदू चौक येथील छञपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वाभिमानी सप्ताहाची सुरवात करण्यात आली.