शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौदा दिवसांत ‘एफआरपी’ द्या

By admin | Updated: November 25, 2015 00:45 IST

शिवसेना : ‘चक्का जाम’चा इशारा; प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : चौदा दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर महसुली जप्तीची कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असताना साखर आयुक्त बघ्याची भूमिका घेणार असतील तर कोल्हापूर जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. मागील थकीत एफआरपी किती, अशी विचारणा करत चालू हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. कायदा काय सांगतो? संबंधितांवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. ज्यांनी चौदा दिवसांत एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांचा लेखापरीक्षकांकडून अहवाल तयार करावा व त्यांच्या महसुली जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच कारखानदारांनी राजकारणासाठी कारखाने उद्ध्वस्त केल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला. हंगामातील एफआरपी न देणाऱ्यांना गाळप परवाना दिलाच कसा? असा सवाल करत शुगरलॉबी सांगेल तसे साखर आयुक्त नाचत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मंत्री समितीच्या निणर्यानुसार कारखान्यांना महिन्याची मुदत दिली आहे. त्या वेळेत एफआरपी न देणाऱ्यांवर आयुक्तांना दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्याची कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी सांगितले. चौदा दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल केले नाही तर आगामी काळात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला. शुभांगी साळोखे, सुषमा चव्हाण, बाजीराव पाटील, भिकाजी हाळदकर, प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, तानाजी आंग्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कर्जाचे व्याज हप्त्यानेच घ्यासाखरेच्या दराचे कारण सांगत एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या साखर कारखानदार व सरकारने आम्हाला हप्त्यावरच खते, बियाणे द्यावी. त्याचबरोबर आमचे पीक कर्जावरील व्याजही हप्त्यानेच घेणार का? असा संतप्त सवाल एका शेतकऱ्याने केला. ‘बिद्री’चा ५० हजारांचा बोनस?‘एफआरपी’ची चर्चा सुरू असताना करंजिवणे (ता. कागल) येथील शेतकरी लक्ष्मण लाड यांनी ‘बिद्री’ कारखान्याने अपात्र कर्जमाफीतील बेकायदेशीर ५० हजारांची कपात केल्याची तक्रार केली. हा बघा ‘बिद्री’ने मला दिवाळीत ५० हजारांचा बोनस दिल्याची पावतीच सहसंचालकांना दिली. याबाबत रितसर अर्ज करा, त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सहसंचालक रावळ यांनी दिले.