शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पहिली उचल ३००० रुपये द्या!

By admin | Updated: November 13, 2014 00:42 IST

अखिल भारतीय किसान सभा : कोल्हापुरात ऊस परिषदेत राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर : नवीन सरकारने नुकत्याच स्थापन केलेल्या ऊसदर नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि. १५) होत आहे. या बैठकीत ऊसदराची पहिली उचल ३,००० रुपये जाहीर करावी, असा ठराव आज, बुधवारी करण्यात आला. या बैठकीत जर हा दर जाहीर झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेतर्फे देण्यात आला आहे.रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी हॉल येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक व ऊस परिषद झाली. यावेळी ऊसदराबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यात आली. प्रमुख उपस्थितीत सभेचे अध्यक्ष कॉ. दादा रायपुरे (बुलडाणा) व जनरल सेक्रेटरी कॉ. किसन गुजर (नाशिक) यांची होती.दादा रायपुरे म्हणाले, ऊसदर नियामक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत ऊसदर निश्चित करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वास्तव उत्पादक खर्च लक्षात घेतला पाहिजे. उत्पादन खर्चाच्या बाबींचा विचार करावा, तसेच किमान त्यांचा चरितार्थ चालावा याची दर जाहीर करताना काळजी घ्यावी. चांगला दर दिला तरच शेतकरी वाचेल. या बैठकीत जर दर कमी जाहीर करून शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास किसान सभेतर्फे राज्यव्यापी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल. शुक्रवारनंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहीम हाती घेतली जाईल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली जातील.किसान सभेचे मार्गदर्शक कॉ. प्रा. सुभाष जाधव म्हणाले, या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी कापूस दरासाठी आंदोलन केले होते; परंतु सत्तेत आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या मागणीपेक्षा कमी दर जाहीर केला. अशीच काहीची परिस्थिी ऊस दराबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या ज्या संघटनांनी रंगराजन समितीच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्या स्वीकारल्यास शेतकऱ्यांना उसाला २५०० रुपयांच्या पुढे दर दिला जाऊ शकत नाही. उलट स्वामिनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून सरकारने हमीभाव ठरवून घेतला पाहिजे.कॉ. उदय नारकर म्हणाले, ‘अच्छे दिन आनेवाले है...’ अशी स्वप्ने दाखवीत व आश्वासनांची खैरात करीत ज्या संघटना व पक्षाच्या नेत्यांनी जनतेची खोऱ्याने मते मिळविली. त्या लोकांवर आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ ऊसदराच्या निमित्ताने आली आहे. निवडणुकीवेळी हे ऊसदराचे घोडेमैदान लांब होते. ते आता एकदम जवळ आले आहे. यावेळी जर आश्वासनांची पूर्तता केली नाही तर शेतकरी व जनता निश्चित त्यांना खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.तुळशीदास किल्लेदार (कागल)म्हणाले, खासदार राजू शेट्टी आता सरकारमध्ये असल्याने ते ऊसदराबाबत उघड भूमिका घेतील, असे वाटत नाही. उलट ते सरकार व साखर कारखानदारांचे हित पाहतील. लोकांची भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया आता सुरू होईल. पुढील काळात एक पोकळी निर्माण होईल. ती भरून काढण्यासाठी किसान सभेतर्फे गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. यावेळी सिद्धाप्पा कलशेट्टी (सोलापूर), उमेश देशमुख (सांगली), माणिक अवघडे (कऱ्हाड), आप्पा परीट, प्रा. आबासाहेब चौगले (कोल्हापूर) यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील महालक्ष्मी हॉल येथे बुधवारी अखिल भारतीय किसान सभेची ऊस परिषद झाली. यावेळी अध्यक्ष दादा रायपुरे बोलत होते. शेजारी किसन गुजर, उमेश देशमुख, सुभाष जाधव, उदय नारकर, माणिक अवघडे उपस्थित होते.