शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शेतकऱ्यांना पाचशे रूपये दुसरा हप्ता द्या

By admin | Updated: April 4, 2017 16:16 IST

‘अंकुश’ ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : सोमवारी ठिय्या आंदोलन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ४ : ऊसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पहिल्या हप्तयातून पीक कर्जाची कशीबशी परतफेड झाली, पण पुढील खर्चासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी किमान पाचशे रूपये दुसरी उचल द्यावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पाणी टंचाई आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा ऊसाचे उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली. ऊसाचार एकरी उतारा घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. हंगाम सुरू करताना ठरलेल्या फार्मुल्यानुसार एफआरपी व १७५ रूपये कारखान्यांनी दिले. पण कायद्याने उत्पन्नातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. गेले सहा-सात महिन्यातील साखरेचा खुल्या बाजारातील भाव पाहता कारखान्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना किमान पाचशे रूपये प्रतिटन दुसरी उचल द्यावी. अशी मागणी ‘अंकुश’ ने केली आहे. साखर कारखानदारांना जाग आणण्यासाठी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात एक दिवसाचा ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, सुरेश भोसले, अविनाश पाटील आदींनी दिला आहे.