शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

लवकरात लवकर कर्जमाफी द्या -शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:25 IST

कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला.

ठळक मुद्दे: अन्यथा भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करूमुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याचे बोगसप्रमाणपत्रांसह

कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करत फसवी कर्जमाफी केल्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांची पूजा करून निषेध करण्यात आला.

दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक न्यू शाहूपुरीतील जिल्हा निबंधक कार्यालयासमोर एकवटले. काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याचे बोगसप्रमाणपत्रांसह चारचाकी वाहनातून आगमन झाले. सर्वांना अभिवादन करतच ते आंदोलनस्थळी आले. हुबेहुब मुख्यमंत्र्यांसारखा दिसणाºया या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची महिला शिवसैनिकांनी फुले उधळून व आरती ओवाळून पूजा करत अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविला.

यानंतर या प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप केले. मुख्यमंत्री बोगस असून त्यांनी कर्जमाफीची बोगस प्रमाणपत्रे देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दांत संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांसह सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकाºयांना बाहेर बोलविले. त्यानुसार सहाय्यक निबंधक अमित गराडे आंदोलनस्थळी आले. या ठिकाणी त्यांच्यावर कर्जमाफीची स्थिती काय? किती लोकांना कर्जमाफी दिली? अशा प्रश्नांची सरबत्ती करून जाब विचारला. गराडे यांनी लाभार्थ्यांची यादी उपलब्ध झाली असून, त्याची पडताळणी करून संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. यावर सरकारने चुकीचे आकडे देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत देवणे यांनी कर्जमाफीबद्दल सरकार फसव्या आकड्यांचा खेळ करत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आॅनलाईन फॉर्म न भरलेल्या शेतकºयांचे आॅफलाईन फॉर्म मुदतवाढ देऊन भरून घ्यावेत. आधारकार्ड नसणारे १२ हजार शेतकºयांचे अर्ज आधारकार्डशिवाय मंजूर करावेत. महाराष्टÑ शासनाचे निकष व त्याची छाननी यातून तांबडा, निळा, पिवळा पट्टा हे निकष त्वरित रद्द करावेत, आदी मागण्या निवेदनांतून करण्यात आल्या आहेत.आंदोलनात सुजित चव्हाण, रवी चौगुले, शिवाजी जाधव, शशी बीडकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, नामदेव गिरी, महादेव गौड, बाजीराव पाटील, शैलेश पुणेकर, शुभांगी पोवार, शांता जाधव, मेघणा पेडणेकर, सुजाता सोहणी, रणजित आयरेकर, आदी सहभागी झाले होते.महसूलमंत्र्यांचे विधान धक्कादायकशेतकºयांनी कर्ज भरले नाही, तर सरकार कर्जबाजारी होईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबाद येथे केले आहे. ज्यांना सरकार चालवायला दिले त्यांच्याकडूनच असे विधान येत असेल, तर ते धक्कादायक आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे देवणेयांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपPoliticsराजकारण