शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

भात उत्पादकांना ५०० रुपये बोनस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनही घटले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सरकारने ५०० रुपये प्रतिक्व्ािंटल बोनस जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनही घटले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सरकारने ५०० रुपये प्रतिक्व्ािंटल बोनस जाहीर करावा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित तिसºया भात परिषदेमध्ये ते बोलत होते.राजू शेट्टी म्हणाले, व्यापाºयांच्या खरेदी केंद्रातून शेतकºयांची लुबाडणूक होत असून एम. एस. पी.पेक्षा कमी दराने भात खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्यात यावी. शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी दराने तांदूळ व शेतकºयाचा जादा दराने भात खरेदी करता येईल. ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने आवश्यक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेती उद्योग तोट्यात आला असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याला आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत. भातपिकांसह सर्व पिकांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा व शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, अन्यथा राज्य पातळीवरून देशपातळीपर्यंत आंदोलन करून सरकारकडून दर हिसकावून घेऊ, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.यावेळी रविकांत तुपकर, प्रा. जालंदर पाटील, राजू गड्यान्नावर, भगवान काटे, सयाजी मोरे, विक्रम पाटील, आदी पदाधिकाºयांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावकर मादनाईक, महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, आदी उपस्थित होते.