शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

जयसिंगपूरच्या विकासासाठी १00 कोटी द्या

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

पालकमंत्र्यांना साकडे : शताब्दी वर्षानिमित्त पालिका शिष्टमंडळाची मागणी

जयसिंगपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जनकपिता जयसिंग महाराज यांच्या नावाने वसवलेल्या जयसिंगपूर शहराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शहराच्या शताब्दी वर्षानिमित्त विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा, अशी मागणी नगरपालिकेचे पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर शहर आखीव व रेखीव असून व्यापारी पेठेबरोबर शैक्षणिक शहर म्हणून उदयास आली आहे. शहरालगत उपनगरांची संख्या वाढत आहे. मागील १० ते १५ वर्षांत शासनाच्या सहकार्यातून भरीव अशी विकासकामे झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भाविण्यासाठी शहरांमध्ये नागरिकांना सेवा सुविधा देणे गरजेचे आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक विकासकामे होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी संजय पाटील-यड्रावकर यांनी मागील १५ वर्षांत झालेल्या विकासकामाची माहिती पालकमंत्री पाटील यांना दिली. मंत्री पाटील यांनी शहराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून शासनाकडून भरीव असा निधी देण्यासाठी आग्रही राहीन, असे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगरसेवक संभाजी मोरे, प्रा. अस्लम फरास, युवराज शहा, अर्जुन देशमुख, राहुल बल्लाळ, रामदास धनवडे, अमरसिंह पाटील, शिवाजी कुंभार, गंगराम माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.