शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

गगनबावड्यातील निवासी बालिका विद्यालय बंद

By admin | Updated: June 11, 2016 00:27 IST

जिल्हा परिषद शाळेत विलीनीकरण : अंमलबजावणीचे प्रशासनास आदेश; कंत्राटी शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड

भीमगोंडा देसाई --कोल्हापूरमहिला साक्षरतेचा टक्का वाढवण्यासाठी आठ वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या सर्व शिक्षण अभियानांतर्गत सुरू झालेले गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बंद करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. तीन किलोमीटरच्या आत जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात या विद्यालयाचे विलीनीकरण जवळच्या जिल्हा परिषदेच्या परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये होणार आहे.सन २००८ मध्ये केंद्र शासनाने शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि महिला साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या राज्यातील ४३ तालुक्यांत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू केली. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे विद्यालय सुरू झाले. या विद्यालयात पाचवीला प्रवेश मिळाल्यानंतर शिक्षण, राहणे, जेवण मोफत आहे. याठिकाणी मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, अनाथ मुली, एक पालक यांच्या मुलींना पाचवीसाठी प्रवेश दिला जात होता. गगनबावड्यात सुरुवातीला ३५ मुलींवर शाळा सुरू झाली. मुलींची शाळा असल्यामुळे सुरक्षिततेची अधिक हमी, गुणवत्ता, चांगल्या सुविधा यामुळे प्रत्येक वर्षी तेथे मुलींची संख्या वाढत राहिली. सध्या पाचवी ते दहावीपर्यंत १५० मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. दर्जेदार अध्यापनामुळे गेल्या वर्षी दहावीचा निकाल १०० टक्के, तर यंदा ९५ टक्के लागला आहे. लोकसहभागातून व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे या विद्यालयात यंदा प्रवेशासाठी मुलींच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, येथील जिल्हा परिषद प्राथमिक विभागाकडे हे विद्यालय बंद करण्याचा आदेश शुक्रवारी आला आहे. त्यामुळे विद्यालयातील कंत्राटी शिक्षकांत खळबळ उडाली आहे. कस्तुरबा विद्यालयाच्या आवारातच जि.प.चे परशुराम विद्यामंदिर, ज्युनिअर कॉलेज आहे. नियमानुसार तीन किलोमीटरच्या आत दोन जि.प.च्या शाळा आहेत. त्यामुळे केवळ कस्तुरबा विद्यालय बंद करून ‘परशुराम’मध्ये विलीन करावे. निवास, भोजन पूर्वीच्याच वसतिगृहात राहील, असे आदेशात म्हटले आहे. प्रत्येक वर्षी ४५ लाखशिक्षण, राहणे, जेवण व इतर व्यवस्थापनासाठी कस्तुरबा विद्यालयास केंद्राकडून प्रत्येक वर्षी ४५ लाख रुपये मिळाले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे ‘कस्तुरबा’वर नियंत्रण आहे. विलीनीकरणाने केंद्राचा कंत्राटी शिक्षकांवरील मानधनावर होणारा खर्च वाचणार आहे.जिल्हा परिषदेच्या परशुराम शाळेत कस्तुरबा विद्यालयाचे विलीनीकरण करावे, असा शासनाचा आदेश मिळाला आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून ‘कस्तुरबा’मधील मुलींच्या शिक्षणाची सोय ‘परशुराम’मध्ये करण्यात येईल. त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय पूर्वीसारखीच राहील.- सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारीतोटा काय होणार?विलीनीकरणाच्या आदेशामुळे कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या आठ शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. याशिवाय केवळ मुलींची शाळा हे अस्तित्व नष्ट होणार आहे. त्या विद्यालयातील मुलींना ‘परशुराम’मधील मुलांसोबत शिकावे लागेल.