शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जयसिंगपुरात ‘घरकुल’ सर्व्हे पालिकेचा पुढाकार : ‘प्रधानमंत्री आवास’साठी नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:00 IST

केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.

संदीप बावचे।जयसिंगपूर : केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, योजनेतील अटींमुळे लाभार्थी मिळणे प्रशासनासमोर अवघड बनले. पालिका सभेत नगरसेवकांकडून या योजनेबाबत विचारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपाची जुनी योजना बंद करत केंद्र सरकारने सन २०१२ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६ पासून सुरू केली आहे. त्यानंतर सर्वेक्षणाआधारे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही ही योजना लागू आहे. जयसिंगपूर शहरातही प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत ठराव झाला होता. मात्र, योजनेला शहरातून अल्पसा प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या पालिका सभेत या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम यांनी केला होता. नगरसेवक अस्लम फरास यांनी आपण तीन जणांचे घरकुल योजनेसाठी बँकेत अर्ज दिले आहेत. मात्र, बँक पैसे द्यायला तयार नाही, असे स्पष्ट केले होते. योजनेवरून सभेत ऊहापोह झाल्यानंतर पालिका प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहेयोजनेतील घटककेंद्र शासनाने सर्वांना २०२२ पर्यंत पक्की घरे उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठेवले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहरात त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये चार घटकांचा समावेश असून ज्याठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्याठिकाणी घरांची निर्मिती करणे, लाभार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार घरे उभारणे, भागीदारी तत्त्वावर घरांची निर्मिती करणे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर नवीन घरकुल अथवा राहत्या घराचे वाढीव बांधकामासाठी अनुदान, अशा घटकांचा या योजनेत समावेश केला आहे.उत्पन्न मर्यादा प्रधानमंत्री आवास योजनेसाठीअत्यल्प ३ लाख, तर अल्प ६ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नाची अट आहे. भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसावे. जयसिंगपूर पालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल. एकूणच पालिकेने घरकुल योजनेसाठी पुढाकार घेतला आहे..प्रस्तावाचे आवाहनप्रधानमंत्री आवास योजनेसाठी जयसिंगपूर शहरातील मागणी विचारात घेऊन या योजनेचा कृती आराखडा तयार करुन तो शासनाला सादर केला जाणार आहे. घरांची मागणी व प्रस्ताव सादर करण्यासाठी नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. लाभार्थ्यांना घरे मागणीसाठी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करण्यात आली आहेत शिवाय पालिकेतदेखील अर्ज उपलब्ध आहेत.