शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा:चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:25 IST

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते ...

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते अधिक चांगले करा. नसल्यास लोकभावना लक्षात घेऊन मंदिर उभा करा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मी करेन, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून आयोजित ‘नवऊर्जा महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा रविवारी रात्री श्री दत्तगुरूंच्या ३३ फुटी मूर्तीसमोर आरती करून समारोप झाला. यावेळी अंजली पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. त्याला सुमारे आठ लाख जणांनी भेट दिली. त्यातील साधारणत: चार लाख बाहेरील पर्यटक होते. परमेश्वर मानणाऱ्यांसाठी एक माध्यम म्हणून हा उत्सव कामी आला. पोटाची भूक पूर्ण झाल्यानंतर मनाची भूक भागविण्यासाठी असे महोत्सव, कार्यक्रम शासन आणि विविध संस्थांनी घ्यावेत. समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. त्यातून एक सकारात्मक दबाव निर्माण होतो. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा.या कार्यक्रमात राहुल चिकोडे यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात दुपारी राजेंद्र मेस्त्री आणि सहकाºयांनी ‘नाद सुरमयी’ हा कार्यक्रम सादर केला. राम सारंग, रवींद्र जोशी, मेधप्रणव पोवार, करण चव्हाण, विक्रम पाटील, महेश बगाडे, शिवतेज पाटील, तृप्ती पाटील, श्रीराज भोसले, आदित्य सवळकर, पूर्वा कोडोलीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित, अ‍ॅड. धनंजय पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘मामाच्या गावाला जाऊया’ निबंध स्पर्धेतील विजेते वैष्णवी कबेळकर, आर्य नलवडे, तेजस्विनी माळी, श्रावण पोवार, चेतन पाटील, वरद घोडके यांना बक्षिसे देण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांनी नवऊर्जा गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. संग्राम पाटील यांनी मराठी सिनेगीते सादर केली. या महोत्सवाला नागरिक, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला.