शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा:चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:25 IST

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते ...

कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते अधिक चांगले करा. नसल्यास लोकभावना लक्षात घेऊन मंदिर उभा करा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मी करेन, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून आयोजित ‘नवऊर्जा महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा रविवारी रात्री श्री दत्तगुरूंच्या ३३ फुटी मूर्तीसमोर आरती करून समारोप झाला. यावेळी अंजली पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. त्याला सुमारे आठ लाख जणांनी भेट दिली. त्यातील साधारणत: चार लाख बाहेरील पर्यटक होते. परमेश्वर मानणाऱ्यांसाठी एक माध्यम म्हणून हा उत्सव कामी आला. पोटाची भूक पूर्ण झाल्यानंतर मनाची भूक भागविण्यासाठी असे महोत्सव, कार्यक्रम शासन आणि विविध संस्थांनी घ्यावेत. समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. त्यातून एक सकारात्मक दबाव निर्माण होतो. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा.या कार्यक्रमात राहुल चिकोडे यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात दुपारी राजेंद्र मेस्त्री आणि सहकाºयांनी ‘नाद सुरमयी’ हा कार्यक्रम सादर केला. राम सारंग, रवींद्र जोशी, मेधप्रणव पोवार, करण चव्हाण, विक्रम पाटील, महेश बगाडे, शिवतेज पाटील, तृप्ती पाटील, श्रीराज भोसले, आदित्य सवळकर, पूर्वा कोडोलीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित, अ‍ॅड. धनंजय पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘मामाच्या गावाला जाऊया’ निबंध स्पर्धेतील विजेते वैष्णवी कबेळकर, आर्य नलवडे, तेजस्विनी माळी, श्रावण पोवार, चेतन पाटील, वरद घोडके यांना बक्षिसे देण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांनी नवऊर्जा गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. संग्राम पाटील यांनी मराठी सिनेगीते सादर केली. या महोत्सवाला नागरिक, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला.