शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

अडीच तालुक्यांचा भौगोलिक विस्तार

By admin | Updated: September 23, 2014 00:47 IST

सिंधुदुर्गला स्पर्शणारी सीमारेषा : गगनबावडा ते आंबोलीपर्यंत विस्तीर्ण मतदारसंघ

संजय पारकर - राधानगरी -संपूर्ण राधानगरी, भुदरगड आणि निम्मा आजरा तालुका असा सुमारे अडीच तालुक्यांच्या मतदारांवर भिस्त म्हणून आकारास आलेला हा राधानगरी-भुदरगड मतदारसंघ होय. १९५२ पासून १९८० पर्यंत सुमारे तीनवेळा मतदारसंघाची चिरफाड करून दुसरा भाग जोडून मतदारसंघ भौगोलिकरीत्या विस्तारलेला आहे. गगनबावड्यापासून आंबोलीला भिडलेल्या या मतदारसंघाची सीमारेषा लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तिन्हींही विधानसभा मतदारसंघाला स्पर्शून जाते. या अवाढव्य विस्तारामुळे येथे प्रत्येक निवडणुकीत आमदारकीची संधी ही नव्या उमेदवाराला मिळते. अपवाद के. पी. पाटील वगळता. ‘के. पी.’नीच फक्त सलग दोन वेळा निवडून येऊन मतदारसंघातील ‘फक्त एकदाच विजयी’ ही परंपरा खंडित केली.विधानसभेच्या १९५२च्या पहिल्या निवडणुकीत फक्त राधानगरी तालुक्यापुरता हा मतदारसंघ होता. १९५७ मध्ये यात भुदरगड तालुक्याचा समावेश केला. डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यावेळी कम्युनिष्ट पक्षाला फायदा झाला. १९८० च्या फेररचनेत राधानगरी तालुक्यातील संपूर्ण राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे ही गावे वगळून त्यांचा समावेश करवीर तालुक्यातील सांगरूळ मतदारसंघात झाला.वगळलेला परिसर तसा पूर्वीचा शे.का.प.च्या प्रभावाखाली होता; पण भोगावती साखर कारखान्यामुळे काँग्रेसने येथे चांगले बस्तान बसविले. त्याचा पुढील निवडणुकीवर दुहेरी परिणाम झाला. त्यानंतर एकदाच काँग्रेसला विजय मिळाला. तसेच पाचवेळा काँग्रेसत्तरांना विजय मिळाला. तसेच सहापैकी दोनवेळा राधानगरीतील व चारवेळा भुदरगडमधील उमेदवार विजयी झाले. २००९ मध्ये राज्यात मतदारसंघाची फेररचना झाली. यावेळी राधानगरीतील यापूर्वी वगळलेली गावे पूर्ववत समाविष्ट केली. शिवाय पूर्वीच्या चंदगड मतदारसंघातील आजरा तालुक्यातील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ जोडला. त्यानुसार अवाढव्य परिसर सध्याचा मतदारसंघ अस्तित्वात आला. तीन लाखांवर मतदानापैकी निम्म्यांहून जास्त मतदान राधानगरी तालुक्यातील आहे, तर एक लाख दहा हजार भुदरगड व चाळीस हजारांवर आजऱ्यातील मतदान आहे. त्यामुळे मतदारसंघावर मतदारसंख्येनिहाय पहिले, तर राधानगरी तालुक्याचेच प्राबल्य राहिले आहे; पण काँग्रेस अंतर्गत गटबाजीची मोठी बंडाळी या तालुक्यात असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतून आपापला गट सांभाळण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला. पण, या गटबाजीचा फटका प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना बसला आहे.आतापर्यंतच्या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक पाचवेळा काँग्रेस, तीन वेळा बंडखोर, दोनवेळा शेकाप, तर कम्युनिस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक वेळा येथून विजय मिळविला आहे.आतापर्यंतचे आमदार१९५२ : डी. एस. आंबेकर१९५७ : काका देसाई१९६२ : आनंदराव देसाई१९६७ : गोविंदराव कलिकते१९७२ : किसनराव मोरे१९७८ : दिनकरराव जाधव१९८० : हरीभाऊ कडव१९८५ : बजरंग देसाई१९९० : शंकर धोंडी पाटील१९९५ : नामदेवराव भोईटे१९९९ : बजरंग देसाई२००४ व २००९ : के. पी. पाटील