शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

अडीच तालुक्यांचा भौगोलिक विस्तार

By admin | Updated: September 23, 2014 00:47 IST

सिंधुदुर्गला स्पर्शणारी सीमारेषा : गगनबावडा ते आंबोलीपर्यंत विस्तीर्ण मतदारसंघ

संजय पारकर - राधानगरी -संपूर्ण राधानगरी, भुदरगड आणि निम्मा आजरा तालुका असा सुमारे अडीच तालुक्यांच्या मतदारांवर भिस्त म्हणून आकारास आलेला हा राधानगरी-भुदरगड मतदारसंघ होय. १९५२ पासून १९८० पर्यंत सुमारे तीनवेळा मतदारसंघाची चिरफाड करून दुसरा भाग जोडून मतदारसंघ भौगोलिकरीत्या विस्तारलेला आहे. गगनबावड्यापासून आंबोलीला भिडलेल्या या मतदारसंघाची सीमारेषा लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तिन्हींही विधानसभा मतदारसंघाला स्पर्शून जाते. या अवाढव्य विस्तारामुळे येथे प्रत्येक निवडणुकीत आमदारकीची संधी ही नव्या उमेदवाराला मिळते. अपवाद के. पी. पाटील वगळता. ‘के. पी.’नीच फक्त सलग दोन वेळा निवडून येऊन मतदारसंघातील ‘फक्त एकदाच विजयी’ ही परंपरा खंडित केली.विधानसभेच्या १९५२च्या पहिल्या निवडणुकीत फक्त राधानगरी तालुक्यापुरता हा मतदारसंघ होता. १९५७ मध्ये यात भुदरगड तालुक्याचा समावेश केला. डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यावेळी कम्युनिष्ट पक्षाला फायदा झाला. १९८० च्या फेररचनेत राधानगरी तालुक्यातील संपूर्ण राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे ही गावे वगळून त्यांचा समावेश करवीर तालुक्यातील सांगरूळ मतदारसंघात झाला.वगळलेला परिसर तसा पूर्वीचा शे.का.प.च्या प्रभावाखाली होता; पण भोगावती साखर कारखान्यामुळे काँग्रेसने येथे चांगले बस्तान बसविले. त्याचा पुढील निवडणुकीवर दुहेरी परिणाम झाला. त्यानंतर एकदाच काँग्रेसला विजय मिळाला. तसेच पाचवेळा काँग्रेसत्तरांना विजय मिळाला. तसेच सहापैकी दोनवेळा राधानगरीतील व चारवेळा भुदरगडमधील उमेदवार विजयी झाले. २००९ मध्ये राज्यात मतदारसंघाची फेररचना झाली. यावेळी राधानगरीतील यापूर्वी वगळलेली गावे पूर्ववत समाविष्ट केली. शिवाय पूर्वीच्या चंदगड मतदारसंघातील आजरा तालुक्यातील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ जोडला. त्यानुसार अवाढव्य परिसर सध्याचा मतदारसंघ अस्तित्वात आला. तीन लाखांवर मतदानापैकी निम्म्यांहून जास्त मतदान राधानगरी तालुक्यातील आहे, तर एक लाख दहा हजार भुदरगड व चाळीस हजारांवर आजऱ्यातील मतदान आहे. त्यामुळे मतदारसंघावर मतदारसंख्येनिहाय पहिले, तर राधानगरी तालुक्याचेच प्राबल्य राहिले आहे; पण काँग्रेस अंतर्गत गटबाजीची मोठी बंडाळी या तालुक्यात असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतून आपापला गट सांभाळण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला. पण, या गटबाजीचा फटका प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना बसला आहे.आतापर्यंतच्या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक पाचवेळा काँग्रेस, तीन वेळा बंडखोर, दोनवेळा शेकाप, तर कम्युनिस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक वेळा येथून विजय मिळविला आहे.आतापर्यंतचे आमदार१९५२ : डी. एस. आंबेकर१९५७ : काका देसाई१९६२ : आनंदराव देसाई१९६७ : गोविंदराव कलिकते१९७२ : किसनराव मोरे१९७८ : दिनकरराव जाधव१९८० : हरीभाऊ कडव१९८५ : बजरंग देसाई१९९० : शंकर धोंडी पाटील१९९५ : नामदेवराव भोईटे१९९९ : बजरंग देसाई२००४ व २००९ : के. पी. पाटील