शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

‘भू-विकास’प्रश्नी अर्थखात्याकडून दखल

By admin | Updated: December 3, 2015 00:48 IST

सहकार विभागाला पत्र : तातडीने बैठक घेण्याची विनंती

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी न देताच कार्यमुक्त करण्याच्या धोरणाबाबत कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सहकार विभागाने यासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना किमान दिलासा मिळाला आहे. कर्ज वसुलीसाठी आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून इतरांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे धोरण राज्य शासनाने परिपत्रकातून स्पष्ट केले होते. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) व इतर वैधानिक देणी कर्ज वसुलीतून अदा करण्यात येणार होती. कर्ज वसुलीला प्रतिसाद न मिळाल्यास मालमत्तांच्या लिलावातून ही देणी भागविण्याचे धोरण होते. प्रत्यक्षात सहकार विभागाकडून कोणतीही देणी न देताच कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. देणी न देता कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे प्रकार राज्यातील काही जिल्ह्यात घडल्याची तक्रार राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सोमवारी शासनाकडे केली. भू-विकास बँकांच्या प्रश्नावर नियुक्त त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना त्यांनी तक्रारीचे निवेदन पाठविले होते. समितीचे अध्यक्ष अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या तक्रारीची दखल घेत, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून, याबाबत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तक्रारीत एम. पी. पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील कर्मचाऱ्यांनी इतका संघर्ष करूनही भू-विकास बॅँकांचे पुनरुज्जीवन राज्य शासनाने केले नाही. बॅँकांचे पुनरुज्जीवन सहज शक्य होते. तरीही बँका अवसायनात काढण्याचा दुर्दैवी निर्णय झाला. तरीही मंत्रीगट समितीने कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचा, काहींना अन्य शासकीय विभागात सामावून घेण्याचा निर्णय झाला. वास्तविक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करताना त्यांची देणी प्रथम देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात धोरणे राबविली जात आहेत. या गोष्टी तात्काळ थांबवून राज्यातील भू-विकास बँक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. शासननिर्णय आणि शिखर बँकेच्या कार्यपद्धतीप्रमाणे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती लागू करावी. आर्थिक अडचणी येत असतील तर मालमत्तांचे लिलाव करून कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) ‘सहकार’च्या धोरणांबाबत नाराजी कायम राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेने तूर्त आंदोलनाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांमधून सहकार विभागाच्या धोरणांबाबत नाराजी कायम आहे.