शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

‘भू-विकास’प्रश्नी अर्थखात्याकडून दखल

By admin | Updated: December 3, 2015 00:48 IST

सहकार विभागाला पत्र : तातडीने बैठक घेण्याची विनंती

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी न देताच कार्यमुक्त करण्याच्या धोरणाबाबत कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सहकार विभागाने यासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना किमान दिलासा मिळाला आहे. कर्ज वसुलीसाठी आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून इतरांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे धोरण राज्य शासनाने परिपत्रकातून स्पष्ट केले होते. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) व इतर वैधानिक देणी कर्ज वसुलीतून अदा करण्यात येणार होती. कर्ज वसुलीला प्रतिसाद न मिळाल्यास मालमत्तांच्या लिलावातून ही देणी भागविण्याचे धोरण होते. प्रत्यक्षात सहकार विभागाकडून कोणतीही देणी न देताच कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. देणी न देता कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती देण्याचे प्रकार राज्यातील काही जिल्ह्यात घडल्याची तक्रार राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सोमवारी शासनाकडे केली. भू-विकास बँकांच्या प्रश्नावर नियुक्त त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना त्यांनी तक्रारीचे निवेदन पाठविले होते. समितीचे अध्यक्ष अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या तक्रारीची दखल घेत, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून, याबाबत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तक्रारीत एम. पी. पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील कर्मचाऱ्यांनी इतका संघर्ष करूनही भू-विकास बॅँकांचे पुनरुज्जीवन राज्य शासनाने केले नाही. बॅँकांचे पुनरुज्जीवन सहज शक्य होते. तरीही बँका अवसायनात काढण्याचा दुर्दैवी निर्णय झाला. तरीही मंत्रीगट समितीने कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचा, काहींना अन्य शासकीय विभागात सामावून घेण्याचा निर्णय झाला. वास्तविक कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करताना त्यांची देणी प्रथम देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात धोरणे राबविली जात आहेत. या गोष्टी तात्काळ थांबवून राज्यातील भू-विकास बँक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. शासननिर्णय आणि शिखर बँकेच्या कार्यपद्धतीप्रमाणे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृती लागू करावी. आर्थिक अडचणी येत असतील तर मालमत्तांचे लिलाव करून कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) ‘सहकार’च्या धोरणांबाबत नाराजी कायम राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेने तूर्त आंदोलनाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांमधून सहकार विभागाच्या धोरणांबाबत नाराजी कायम आहे.