शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राजकारणात अडकल्या तालुक्याच्या आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:38 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तालुक्यांतील प्रलंबित प्रश्नांवर स्थानिक आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या समोर चर्चा होऊन त्याची सोडवणूक व्हावी, या हेतूने वर्षाला आमसभा घ्यावी, असे संकेत आहेत. पण, आमदार एका पक्षाचा आणि पंचायत समितीवर दुसऱ्या पक्षाची सत्ता अशा सत्तेच्या त्रांगड्यात या आमसभा अडकल्या आहेत. बहुतांशी तालुक्यात पंधरा ते वीस वर्षे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तालुक्यांतील प्रलंबित प्रश्नांवर स्थानिक आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या समोर चर्चा होऊन त्याची सोडवणूक व्हावी, या हेतूने वर्षाला आमसभा घ्यावी, असे संकेत आहेत. पण, आमदार एका पक्षाचा आणि पंचायत समितीवर दुसऱ्या पक्षाची सत्ता अशा सत्तेच्या त्रांगड्यात या आमसभा अडकल्या आहेत. बहुतांशी तालुक्यात पंधरा ते वीस वर्षे सभाच झालेली नाही. सभा न घेण्यामागे राजकीय उदासीनता जरी असली तरी ग्रामसभांना जसा संविधानिक दर्जा आहे, त्याप्रमाणे आमसभांना मिळणे गरजेचे आहे.महाराष्टÑात ज्यावेळी त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्था १९६२ ला अस्तित्वात आली. त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती व्हावी, तालुक्यातील जटील प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी १९६७ ला आमसभा घेण्याचा निर्णय झाला; पण हे करत असताना त्याला संविधानिक अधिकार दिला गेला नाही.त्या सभेला स्वत: जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी उपस्थित राहून त्या दिवशीच्या कामाचे प्रोसिडिंग झाले पाहिजे.त्यानुसार वर्षभरात त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. गेल्या ५० वर्षांत सुरुवातीला कालावधी सोडला, तर अलीकडे आमसभांचा विसरच प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींना पडला आहे. वास्तविक आमसभा म्हणजे तालुक्याच्या केंद्रस्थानी मानल्या पाहिजेत. त्यातून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागत असतात.जिल्ह्यात १२ तालुक्यांचा आढावा घेतला असता, दोन-तीन तालुके सोडले, तर दहा वर्षांपूर्वी सभा झालेल्या आहेत. तालुक्याच्या आमदारांची संबधित पंचायत समितीमध्ये सत्ता नसली तर आमसभांचा विषयच सोडा. राजकीय आमसभांबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये उदासिनता आहे, हे जरी खरे असले तरी ग्रामसभांप्रमाणे आमसभांना संविधानिक अधिकार देणे गरजेचे आहे. हे अधिकार दिले तर त्याचे महत्त्व वाढून त्या घेण्याचे बंधनकारक राहतील.ग्रामसभाप्रमाणे आमसभेला संविधानिक अधिकार द्यावा, यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडली होती. सभेला सरपंच, उपसरपंचांना प्रवेश देण्याबाबत ग्रामविकासमंत्र्यांनी उत्तरे दिली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केवळ औपचारिकता म्हणून आमसभा न घेता त्याला अधिकार देण्याची सूचनाही केली होती.- आमदार प्रकाश आबिटकरग्रामसभांप्रमाणेच आमसभेला महत्त्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा लेखाजोखा मांडून कामांचा निपटारा करण्याचे चांगले व्यासपीठ आहे; पण दुर्दैवाने राजकीय महत्त्वाकांक्षेत या सभा अडकल्या आहेत.- भारत पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद)यावर्षी झाल्या तालुक्याच्या आमसभा. तालुका, कंसात वर्ष असे४पन्हाळा (२००५), करवीर (२००५), कागल (१९९८) , चंदगड (२००७ ), आजरा (२००७), राधानगरी (२००७), भुदरगड ( २०१३) , शाहूवाडी (२००२), गगनबावडा (२०११़), राधानगरी (२००७), गडहिग्लज (२०१७), हातकणंगले (२०१४)