शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गायत्री पटेल ठरली भारी, केली २८ राज्यांची मोटारसायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : विविध २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि १८ जागतिक वारसास्थळांचा प्रवास करत कोल्हापूरच्या गायत्री लक्ष्मण पटेल यांनी ...

कोल्हापूर : विविध २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि १८ जागतिक वारसास्थळांचा प्रवास करत कोल्हापूरच्या गायत्री लक्ष्मण पटेल यांनी महिला सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली. देशभर १८० दिवस तब्बल ३० हजार किलोमीटरचा प्रवास करून ती गुरुवारी कोल्हापुरात परतली. घाटगे ग्रुप, टीव्हीएस, माय टीव्हीएसने तिचे उत्साहात स्वागत केले. टीव्हीएसने तिला देशातील पहिली टीव्ही अपाची आरआर ३१० (बीओटी) प्रदान करून सन्मानित केले.

इंटेरिअर डिझायनर असलेली गायत्री ही रेसकोर्स (संभाजीनगर) येथे राहते. तिने ‘वन ड्रीम, वन राइड-इंडियन ओडिसी’ हे ब्रीद घेऊन कोल्हापुरातून दि.५ डिसेंबर रोजी मोटारसायकल प्रवास सुरू केला. टीव्हीएस अपाची आरटीआर (२०० फोरव्ही) या दुचाकीवरून ती रोज ४०० ते ७०० किलोमीटरचा प्रवास करत होती. मुंबई, जयपूर, दिल्ली, श्रीनगर, आग्रा, सिलीगुडी, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर, कोइम्बतूर, हैदराबाद, चेन्नई, कोची, बंगळुरू याठिकाणी प्रवास करून ती गुरुवारी कोल्हापुरात परतली. माई टीव्हीएस येथे माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेविका जयश्री जाधव यांच्या हस्ते ‘अपाची आरआर’ ही मोटारसायकल गायत्री हिला प्रदान करण्यात आली. यावेळी घाटगे ग्रुपचे अध्यक्ष मोहन घाटगे, ‘टीव्हीएस’चे महाराष्ट्राचे एरिया मॅनेजर अंबरीश अवस्थी, प्रीमिअम मोटरसायकल विभागाचे सहायक व्यवस्थापक शॉन कॉलिन्स, माई टीव्हीएसचे महाव्यवस्थापक अनिल कांबळे, उद्योजक सत्यजित जाधव, गायत्रीचे वडील लक्ष्मण, आई पुष्पा, भाऊ दीप पटेल, जयेश ओसवाल आदींची उपस्थिती होती. गायत्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांना प्लॅटफॉर्म दिल्याचा आनंद

कोल्हापुरातील युवती, महिलांना रायडर म्हणून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रायडिंगची सन २०१६ मध्ये सुरुवात केली. त्यात यशस्वी झाल्याचा आनंद होत असल्याचे गायत्री हिने सांगितले. तीस हजार किलोमीटरचा प्रवास रस्ते, तेथील वातावरण कसे असणार याची माहिती नव्हती. मात्र, जिद्दीने आणि एक मिशन समजून हा प्रवास पूर्ण केला. त्यासाठी कुटुंबीय, टीव्हीएसचे पाठबळ लाभल्याचे तिने सांगितले.