शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गौराई, शंकरोबाची बाजारपेठेत टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : हवामानातील बदल आणि अति पावसामुळे यंदा तेरडा (गौराई) आणि द्रोणपुष्पी(शंकरोबा) या तणवर्गीय वनस्पतीची टंचाई बाजारपेठेत तीव्रपणे जाणवत ...

कोल्हापूर : हवामानातील बदल आणि अति पावसामुळे यंदा तेरडा (गौराई) आणि द्रोणपुष्पी(शंकरोबा) या तणवर्गीय वनस्पतीची टंचाई बाजारपेठेत तीव्रपणे जाणवत आहे. गणेशोत्सवात याला मागणी आहे, पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत विक्रीसाठी ही वनस्पती कमी उपलब्ध राहिली. यामुळे लहान पेंडीचा दर ५० रुपयांपेक्षा अधिक राहिला.

गणेशोत्सवात गौराई पूजनाला महत्त्व आहे. रविवारी सकाळी घराघरात याचे पूजन करण्यासाठी तेरडा आणि द्रोणपुष्पी वनस्पती खरेदीसाठी शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली होती, पण गेल्या वर्षीपेक्षा या वनस्पतीची आवक बाजारात कमी राहिली. परिणामी, दरही वधारले होते.

गौरीपूजनाच्या दिवशी पन्हाळा, करवीर आणि शहरातील आजूबाजूचे शेतकरी ही वनस्पती विक्रीसाठी आणतात. डोंगराळ भागात ही वनस्पती अधिक असते, पण यंदा अति पाऊस झाल्याने आणि हवामान पोषक नसल्याने या वनस्पतीची उगवण, वाढ अपेक्षित प्रमाणात झाली नाही. यापूर्वी सहजपणे उपलब्ध होणारी ही वनस्पती यंदा शेतकऱ्यालाही आपल्या घरात पूजनासाठी शोधावी लागली. विक्रीसाठी बाजारातही कमी आली. त्याची टंचाई निर्माण झाली. याचा गैरफायदा घेण्यासाठी काही विक्रेत्यांनी तेरडा आणि द्रोणपुष्पीसारखीच दिसणारी दुसरी वनस्पती विक्रीसाठी घेऊन आले होते, पण वर्षानुवर्षे गौरी पूजन करणाऱ्या महिलांनी निवड करून तेरडा, द्रोणपुष्पीच गौरी, शंकरोबाच्या पूजनासाठी घेऊन जात होते.

चौकट

त्वचा रोगासाठी उपयोगी

तेरडा, द्रोणपुष्पी वनस्पतीची पाने उगाळून लावल्यास त्वचारोग कमी होतो, असे वनस्पती अभ्यासक सांगतात. त्याच्या फुलांचा रंगही वेगवेगळा असतो. फुलांपासून रंगही तयार करता येते. म्हणून या वनस्पती बहुउपयोगी म्हणून समजली जाते.

कोट

तेरडा, द्रोणपुष्पी वनस्पती बहुउपयोगी आहे. तणवर्गीय असल्याने वाढ चांगली असते. यंदा अती पाऊस, हवामानातील आमूलाग्र बदलामुळे या वनस्पतीची कमतरता दिसते. यंदा पूजन केलेली ही वनस्पती परिपक्व अवस्थेत असल्याने बिया आहेत. गणेश विसर्जन दिवशी त्या बिया काढून शेताच्या बांधावर किंवा डोंगरावर टाकाव्यात. जेणेकरून पुढील वर्षी याची टंचाई भासणार नाही.

अनिल चौगुले, निसर्ग मित्र