शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वर्षभरात गॅस सिलिंडर २४१ रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

सचिन भोसले : लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. त्यात केंद्रानेही घरगुती गॅस ...

सचिन भोसले : लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. त्यात केंद्रानेही घरगुती गॅस सिलिंडरचे दर वर्षभरात तब्बल २४१ रुपयांनी दर वाढविले आहेत. मागील वर्षी जुलै २०२० मध्ये ५९७ रुपये इतका प्रति सिलिंडरमागे दर होता. आज हाच दर ८३७.५० रुपये इतका झाला आहे. मात्र, बँक खात्यात अनुदान काही जमा केलेली नाही. विशेष म्हणजे याबाबत स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळे गोरगरिबांने जगायचं कसे? असाच प्रश्न तयार झाला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ मनुष्यहानी झाली नाही तर संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले. त्यामुळे ८३७.५० रुपये मोजून घरगुती सिलिंडर घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यात सर्वसामान्यांचा आधार म्हणून किमान एका सिलिंडरवर १०० ते १२५ रुपयांपर्यंतची सबसिडी (अनुदान) गॅस धारकाला मिळत होते. मात्र, तेही जुलै २०२० पासून हा आधारही जवळपास बंद झाला आहे. शहरातील नागरिकांना एका बाजूने गॅस सिलिंडर परवडत नाही. दुसऱ्या बाजूने घरी चूलही पेटविता येत नाही. कारण, शहरात लाकडे अथवा जळण मिळत नाही. कुटुंब प्रमुखाच्या पगारात हा वाढलेला गॅस सिलिंडरचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सबसिडीही बंद केल्यामुळे गॅसधारक हवालदिल झाले आहेत.

महिना सिलिंडरचे दर : अनुदान किती मिळाले..

जुलै २०२० ५९७ : शून्य

ऑगस्ट २०२० ५९७ : शून्य

सप्टेंबर २०२० ५९७ : शून्य

ऑक्टोबर २०२० ५९७ : शून्य

नोव्हेंबर २०२० ६४७ : शून्य

डिसेंबर २०२० ६४७ : शून्य

जानेवारी २०२१ - ७२२ : शून्य

फेब्रुवारी २०२१ - ७७२ : शून्य

मार्च २०२१ - ७९७ : शून्य

एप्रिल २०२१ - ८२२ : शून्य

मे २०२१ - ८२२ : शून्य

जून २०२१ - ८३४ : शून्य

जुलै २०२१ - ८३७.५० : शून्य

शहरात चूलही पेटविता येत नाही

एका बाजूने सरकार सिलिंडरचे दर वाढवित असताना त्यावरील सबसिडीही देत नाहीत. त्यामुळे कुटुंबाचे अर्थचक्र बिघडले आहे. शहरात आम्ही चूल पेटवू शकत नाही. त्यामुळे उसनवारी करून सिलिंडर घेण्याशिवाय पर्याय नाही.

- अनुजा साळवी, गृहिणी, शाहुपुरी, कोल्हापूर

कोरोनाने केवळ नोकऱ्या घालविल्या नाही तर आमच्या तोंडाचा घास पळविला आहे. शहरात राहून चूल पेटवू शकत नाही. सिलिंडरशिवाय पर्याय नाही. उधार उसनावारी करून ते घेण्याशिवाय काहीच करू शकत नाही. सरकारने ही दरवाढ कमी करून दिलासा द्यावा.

-नम्रता साळोखे, शिवाजी पेठ, कोल्हापूर

-