शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने ...

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने झालेले आर्थिक नुकसान, जीवनावश्यक साहित्यांचे वाढते दर यामुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दर १५ दिवसांनी केली जाणारी ही दरवाढ म्हणजे नागरिकांना सिलिंडरची सवय लावून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकर आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. सुरुवातील ४०० रुपयांवर असलेला घरगुती गॅस सिलिंडर आता ८८८ रुपयांना झाला आहे. म्हणजे सात वर्षांत तब्बल दुप्पटपेक्षा जास्त रकमेने दर वाढले आहेत. जानेवारीपासून आता आठ महिन्यांत १९१ रुपयांनी सिलिंडरचा दर वाढला आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचे नुकसान झाले, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार थांबला. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने स्मार्ट फोनवरचा खर्च वाढला. सगळीकडून अशी आर्थिक कोंडी झाल्याने सर्वसामान्यांची एवढ्या कमी रकमेत घरखर्च भागवताना तारेवरची कसरत होत आहेत. सिलिंडर ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत पैसा घालवावा लागतो.

-----------

महिना : सिलिंडरचे दर

जानेवारी : ६९७

४ फेब्रुवारी : ७२२

१५ फेब्रुवारी : ७७२

२५ फेब्रुवारी : ७९७

मार्च : ८२२

एप्रिल : ८१२

जुलै : ८३८

१७ ऑगस्ट : ८६३

१ सप्टेंबर : ८८८

---

सबसिडी झाली बंद

दीड वर्षापूर्वीपर्यंत शासनाकडून गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. ग्राहकाकडून नियमाने पैसे घेतले जात होते. पण सबसिडीची रक्कम खात्यावर जमा केली जात होती. पण आता तीदेखील बंद झाल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात.

--

पूर्वी घराघरांत चुली होत्या. तेव्हा सरकारने गाजावाजा करत महिलांना आम्ही धुरापासून मुक्त करत आहोत, पर्यावरणाचे रक्षण करूया, असं म्हणत उज्वला गॅस योजना सुरू केली. घराघरांत गॅस सिलिंडर आला, चुली पेटवायच्या बंद झाल्या. लोकांना गॅसवर स्वयंपाकाची सवय लावली आणि आता दरवाढ करून पैसे उकळले जात आहेत.

-संगीता दुगाणी, मगदूम कॉलनी, पाचगाव

---

गॅस सिलिंडरही जीवनावश्यक वस्तू आहे, रोज ते पेटवल्याशिवाय घरात अन्न शिजत नाही, याची जाण ठेवून सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी ठेवले पाहिजे. उलट दर महिन्याला ते वाढवून सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. आधीच कोरोनाने आर्थिक आरिष्ट्य आलेले असताना दोनवेळचा घासपण महाग करून ठेवला आहे, कसं जगायचं सर्वसामान्यांनी.

-सुनेत्रा चनवर, साळोखेनगर

--