शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने ...

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने झालेले आर्थिक नुकसान, जीवनावश्यक साहित्यांचे वाढते दर यामुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दर १५ दिवसांनी केली जाणारी ही दरवाढ म्हणजे नागरिकांना सिलिंडरची सवय लावून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकर आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. सुरुवातील ४०० रुपयांवर असलेला घरगुती गॅस सिलिंडर आता ८८८ रुपयांना झाला आहे. म्हणजे सात वर्षांत तब्बल दुप्पटपेक्षा जास्त रकमेने दर वाढले आहेत. जानेवारीपासून आता आठ महिन्यांत १९१ रुपयांनी सिलिंडरचा दर वाढला आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचे नुकसान झाले, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार थांबला. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने स्मार्ट फोनवरचा खर्च वाढला. सगळीकडून अशी आर्थिक कोंडी झाल्याने सर्वसामान्यांची एवढ्या कमी रकमेत घरखर्च भागवताना तारेवरची कसरत होत आहेत. सिलिंडर ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत पैसा घालवावा लागतो.

-----------

महिना : सिलिंडरचे दर

जानेवारी : ६९७

४ फेब्रुवारी : ७२२

१५ फेब्रुवारी : ७७२

२५ फेब्रुवारी : ७९७

मार्च : ८२२

एप्रिल : ८१२

जुलै : ८३८

१७ ऑगस्ट : ८६३

१ सप्टेंबर : ८८८

---

सबसिडी झाली बंद

दीड वर्षापूर्वीपर्यंत शासनाकडून गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. ग्राहकाकडून नियमाने पैसे घेतले जात होते. पण सबसिडीची रक्कम खात्यावर जमा केली जात होती. पण आता तीदेखील बंद झाल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात.

--

पूर्वी घराघरांत चुली होत्या. तेव्हा सरकारने गाजावाजा करत महिलांना आम्ही धुरापासून मुक्त करत आहोत, पर्यावरणाचे रक्षण करूया, असं म्हणत उज्वला गॅस योजना सुरू केली. घराघरांत गॅस सिलिंडर आला, चुली पेटवायच्या बंद झाल्या. लोकांना गॅसवर स्वयंपाकाची सवय लावली आणि आता दरवाढ करून पैसे उकळले जात आहेत.

-संगीता दुगाणी, मगदूम कॉलनी, पाचगाव

---

गॅस सिलिंडरही जीवनावश्यक वस्तू आहे, रोज ते पेटवल्याशिवाय घरात अन्न शिजत नाही, याची जाण ठेवून सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी ठेवले पाहिजे. उलट दर महिन्याला ते वाढवून सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. आधीच कोरोनाने आर्थिक आरिष्ट्य आलेले असताना दोनवेळचा घासपण महाग करून ठेवला आहे, कसं जगायचं सर्वसामान्यांनी.

-सुनेत्रा चनवर, साळोखेनगर

--