शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अनुदानाअभावी बायोगॅस लाभार्थीच गॅसवर

By admin | Updated: February 3, 2015 00:27 IST

तीन कोटी पाच लाख थकीत : जिल्ह्यात अडीच हजार लाभार्थी, ५३० इतके बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट

आयुब मुल्ला - खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बायोगॅस योजनेच्या अडीच हजार लाभार्थ्यांना सात महिने झाले तरी अनुदान मिळालेले नाही. अनुदानाचे तीन कोटी पाच लाख रुपये शासनाकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे बायोगॅस योजना अनुदानाअभावी गॅसवर असल्याचे चित्र आहे. त्याचबराबर बायोगॅस योजनेचे स्वरूप नव्या मापदंडामुळे आता बदलणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सन १९८२-८३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने योजना गतीने राबवून सातत्याने राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे. तरीसुद्धा शासनाने चालूवर्षी अनुदान देताना हात आखडता घेतला आहे.चालू वर्षी जिल्ह्याला तीन हजार ५३० इतके बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेरीसच अडीच हजार बायोगॅसची उभारणी जिल्ह्यात झाली आहे; परंतु यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची तीन कोटी पाच लाखांची रक्कमच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झालेली नाही. लाभार्थ्यांनी स्वत: पैसे घालून उभारणी केली आहे. यासाठी त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे अनुदानाच्या रकमेत वाढ झाली असून सर्वसाधारणसाठी नऊ हजार, तर मागासवर्गीयांसाठी अकरा हजार रुपये असे अनुदान करण्यात आले आहे. त्याला शौचालय सलग्न असेल, तर आणखीन बाराशे रुपये असे अनुदान केले आहे.चालू वर्षातील उद्दिष्टांपैकी अद्याप एक हजार बायोगॅसची उभारणी होणार आहे, पण याचा लूक आता पूर्वीसारखा असणार नाही. तोे नव्या मापदंडानुसार बदललेला असेल. पूर्वी लाभार्थ्यांच्या जागा पाहून तिथेच बहुतांश प्रमाणात त्याची जोडणी केली जायची; परंतु आता तो जिथे बसवायचा आहे तिथे तो थोडक्यात रेडिमेडच बसवला जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या घटकांची किंबहुना बायोगॅस जोडणीच्या पार्टची तपासणी ही जिल्हा स्तरावरच होणार आहे. बायोगॅस बसविणाऱ्या उत्पादकांना यासंबंधी सूचना देऊन त्यानुसार तयार झालेल्या संयंत्रणाच बसवण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे. जिथे काळ्या मातीचा भाग, रहदारीच्या ठिकाणी किंवा जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी त्याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. टेरेसरवतीसुद्धा हे संयंत्र बसविणे सोयीचे असेल. यामुळे हे यंत्र तयार करणाऱ्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. याची गॅरंटीही दहा वर्षांपर्यंत आहे; परंतु यासंदर्भात मिळणारे अनुदान मात्र जर संथगतीने मिळणार असेल तर योजना प्रभावी होण्यास प्रतिकुलता निर्माण होईल.