शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी बायोगॅस लाभार्थीच गॅसवर

By admin | Updated: February 3, 2015 00:27 IST

तीन कोटी पाच लाख थकीत : जिल्ह्यात अडीच हजार लाभार्थी, ५३० इतके बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट

आयुब मुल्ला - खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बायोगॅस योजनेच्या अडीच हजार लाभार्थ्यांना सात महिने झाले तरी अनुदान मिळालेले नाही. अनुदानाचे तीन कोटी पाच लाख रुपये शासनाकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे बायोगॅस योजना अनुदानाअभावी गॅसवर असल्याचे चित्र आहे. त्याचबराबर बायोगॅस योजनेचे स्वरूप नव्या मापदंडामुळे आता बदलणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सन १९८२-८३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने योजना गतीने राबवून सातत्याने राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे. तरीसुद्धा शासनाने चालूवर्षी अनुदान देताना हात आखडता घेतला आहे.चालू वर्षी जिल्ह्याला तीन हजार ५३० इतके बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेरीसच अडीच हजार बायोगॅसची उभारणी जिल्ह्यात झाली आहे; परंतु यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची तीन कोटी पाच लाखांची रक्कमच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झालेली नाही. लाभार्थ्यांनी स्वत: पैसे घालून उभारणी केली आहे. यासाठी त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे अनुदानाच्या रकमेत वाढ झाली असून सर्वसाधारणसाठी नऊ हजार, तर मागासवर्गीयांसाठी अकरा हजार रुपये असे अनुदान करण्यात आले आहे. त्याला शौचालय सलग्न असेल, तर आणखीन बाराशे रुपये असे अनुदान केले आहे.चालू वर्षातील उद्दिष्टांपैकी अद्याप एक हजार बायोगॅसची उभारणी होणार आहे, पण याचा लूक आता पूर्वीसारखा असणार नाही. तोे नव्या मापदंडानुसार बदललेला असेल. पूर्वी लाभार्थ्यांच्या जागा पाहून तिथेच बहुतांश प्रमाणात त्याची जोडणी केली जायची; परंतु आता तो जिथे बसवायचा आहे तिथे तो थोडक्यात रेडिमेडच बसवला जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या घटकांची किंबहुना बायोगॅस जोडणीच्या पार्टची तपासणी ही जिल्हा स्तरावरच होणार आहे. बायोगॅस बसविणाऱ्या उत्पादकांना यासंबंधी सूचना देऊन त्यानुसार तयार झालेल्या संयंत्रणाच बसवण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे. जिथे काळ्या मातीचा भाग, रहदारीच्या ठिकाणी किंवा जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी त्याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. टेरेसरवतीसुद्धा हे संयंत्र बसविणे सोयीचे असेल. यामुळे हे यंत्र तयार करणाऱ्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. याची गॅरंटीही दहा वर्षांपर्यंत आहे; परंतु यासंदर्भात मिळणारे अनुदान मात्र जर संथगतीने मिळणार असेल तर योजना प्रभावी होण्यास प्रतिकुलता निर्माण होईल.