शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते

हुपरी : कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून भरविण्यात येणारे २० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन २९ नोव्हेंबरला होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नाडगे व उपाध्यक्ष भगवंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, २९ नोव्हेंबरला (रविवारी) सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत सहा सत्रांमध्ये संमेलन होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सगे यांच्या हस्ते व अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भीमराव गस्ती व राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेनजी यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती असणार आहे. सरस्वती प्रतिमा पूजन बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गोधाबाई गावडे आहेत. यावेळी ग्रामीण लेखक आप्पासाहेब पवार (लोकूर) यांच्या ‘पाऊलवाटा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे ‘शाश्वत ग्रामीण विकास’ या विषयावर मुक्त चिंतन होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये ‘नवी आशा, नवा उन्मेष, नवा आविष्कार’, मातीत मातीशी बोेलू काही... या सदरात नामवंत व उदयोन्मुख कवींचा सहभाग असणाऱ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.चौथ्या सत्रात महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या ‘निराळं जग’ या सदरात ‘सुखी संसाराचे रहस्य’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.