शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

कारदग्यातील ग्रामीण साहित्य संमेलन २९ ला

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते

हुपरी : कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून भरविण्यात येणारे २० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन २९ नोव्हेंबरला होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नाडगे व उपाध्यक्ष भगवंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, २९ नोव्हेंबरला (रविवारी) सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत सहा सत्रांमध्ये संमेलन होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सगे यांच्या हस्ते व अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भीमराव गस्ती व राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा बहेनजी यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती असणार आहे. सरस्वती प्रतिमा पूजन बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण लेखक व कवींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गोधाबाई गावडे आहेत. यावेळी ग्रामीण लेखक आप्पासाहेब पवार (लोकूर) यांच्या ‘पाऊलवाटा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे ‘शाश्वत ग्रामीण विकास’ या विषयावर मुक्त चिंतन होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये ‘नवी आशा, नवा उन्मेष, नवा आविष्कार’, मातीत मातीशी बोेलू काही... या सदरात नामवंत व उदयोन्मुख कवींचा सहभाग असणाऱ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.चौथ्या सत्रात महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या ‘निराळं जग’ या सदरात ‘सुखी संसाराचे रहस्य’ या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.