शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’च्या गाडीअड्डा जागेवर बगीचा

By admin | Updated: February 4, 2015 23:58 IST

महापालिकेचा घाट : सोमवारच्या सभेत ठराव येणार; कारखान्याची न्यायालयात धाव

संतोष पाटील -कोल्हापूर -कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्याच्या मध्येच बगीचा करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत ‘राजाराम’च्या, पर्यायाने १५ हजार सभासदांच्या मालकीच्या जागेवर बगीचा करावा, असा ठराव आडमार्गाने आणला आहे. नेत्यांना खूष करण्यासाठीच हा ठराव घुसडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, याविरोधात राजाराम कारखान्याने न्यायालयात धाव घेतली आहे.कसबा बावडा येथे १९३२ साली स्थापन झालेला राजाराम कारखाना वाढत्या शहरीकरणात शहरातीलच एक भाग बनून गेला. अत्यंत कमी जागेत असलेल्या या कारखान्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कसबा बावड्यातील मध्यवस्तीपासूनच रस्त्यावर थांबलेल्या उसाच्या वाहनांचा तब्बल सहा महिने वाहतुकीस अडथळा होत असतो. बावडा परिसरातील ८० टक्के कुटुंबे शेतीवर आधारित असल्याने हा त्रासही नागरिक सहन करतात. कारखान्याला ‘को-जनरेशन प्लॅँट’च्या उभारणीसाठी जागा नसल्याने प्रकल्पच गेली सात वर्षे खोळंबला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘राजाराम’च्या व्यवस्थापनाने कारखान्याजवळीलच खासगी जागा विकत घेऊन ती उसाच्या बैलगाड्या थांबण्यासाठी ‘गाडीअड्डा’ म्हणून विकसित केली.राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचासाठी आरक्षण टाकण्याचा ठराव महापालिका महासभेपुढे येत आहे. यापूर्वी असा प्रकार घडल्याने कारखान्याने न्यायालयात दाद मागितली आहे. प्रत्यक्षात नगरसेवकांनी आणलेला हा ठराव महापालिका प्रशासनाने, पर्यायाने नगरविकास विभागाने ठेवल्याचे चित्र भासविण्यात येत आहे. आमदार महाडिक यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सभेपुढे हा विषय येताच तो बारगळणार आहे, याची ठराव आणणाऱ्या नगरसेवकांनाही पक्की खात्री आहे. ‘विरोधकांना कसे पळविले’ असे भासवत निव्वळ नेत्यांना खूष करण्यासाठीच ठराव जाहीर करण्याची तसदी घेतल्याची चर्चा आहे.यापूर्वीही असा प्रकारकसबा बावड्यातील एका पेट्रोल पंपाजवळील रिकाम्या जागेवर अशाच प्रकारे आरक्षणाचा ठराव आणण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पडद्यामागे जोरदार हालचाली झाल्या. मात्र, ‘वजन’ ठेवल्यानंतरच ठराव मागे घेण्यात आला. आरक्षण उठवता येत नाही, तर आरक्षण टाकण्याची भीती दाखवून इप्सित साध्य करण्याची ही नवीन टूम आहे.मध्यभागीच बागदक्षिण-उत्तर अशी एकूण दहा एकर असलेल्या या जागेच्या मध्यभागीच उत्तरेच्या बाजूने दोन एकर जागेवर बगीचा करण्याचा ठराव प्रस्तावित आहे. जेणेकरून बैलगाडीसाठी जाणारी वाटही बंद होऊन उर्वरित जागेचा वापर कारखान्यास करता येऊ नये, अशा पद्धतीनेच ठराव आणला आहे.कारखाना अगोदरच अत्यंत दाटीवाटीच्या जागेत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, या उद्देशानेच कारखान्याने ही जागा घेतली. वास्तविक ही जागा १५ हजार सभासदांची आहे. अशा प्रकारे कारखाना मोडीत काढण्याचा कोणी डाव आखत असल्यास शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना संबंधितांना करावा लागेल. - दिलीप पाटील (चेअरमन, राजाराम कारखाना)