शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘राजाराम’च्या गाडीअड्डा जागेवर बगीचा

By admin | Updated: February 4, 2015 23:58 IST

महापालिकेचा घाट : सोमवारच्या सभेत ठराव येणार; कारखान्याची न्यायालयात धाव

संतोष पाटील -कोल्हापूर -कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्याच्या मध्येच बगीचा करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत ‘राजाराम’च्या, पर्यायाने १५ हजार सभासदांच्या मालकीच्या जागेवर बगीचा करावा, असा ठराव आडमार्गाने आणला आहे. नेत्यांना खूष करण्यासाठीच हा ठराव घुसडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, याविरोधात राजाराम कारखान्याने न्यायालयात धाव घेतली आहे.कसबा बावडा येथे १९३२ साली स्थापन झालेला राजाराम कारखाना वाढत्या शहरीकरणात शहरातीलच एक भाग बनून गेला. अत्यंत कमी जागेत असलेल्या या कारखान्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कसबा बावड्यातील मध्यवस्तीपासूनच रस्त्यावर थांबलेल्या उसाच्या वाहनांचा तब्बल सहा महिने वाहतुकीस अडथळा होत असतो. बावडा परिसरातील ८० टक्के कुटुंबे शेतीवर आधारित असल्याने हा त्रासही नागरिक सहन करतात. कारखान्याला ‘को-जनरेशन प्लॅँट’च्या उभारणीसाठी जागा नसल्याने प्रकल्पच गेली सात वर्षे खोळंबला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘राजाराम’च्या व्यवस्थापनाने कारखान्याजवळीलच खासगी जागा विकत घेऊन ती उसाच्या बैलगाड्या थांबण्यासाठी ‘गाडीअड्डा’ म्हणून विकसित केली.राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचासाठी आरक्षण टाकण्याचा ठराव महापालिका महासभेपुढे येत आहे. यापूर्वी असा प्रकार घडल्याने कारखान्याने न्यायालयात दाद मागितली आहे. प्रत्यक्षात नगरसेवकांनी आणलेला हा ठराव महापालिका प्रशासनाने, पर्यायाने नगरविकास विभागाने ठेवल्याचे चित्र भासविण्यात येत आहे. आमदार महाडिक यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सभेपुढे हा विषय येताच तो बारगळणार आहे, याची ठराव आणणाऱ्या नगरसेवकांनाही पक्की खात्री आहे. ‘विरोधकांना कसे पळविले’ असे भासवत निव्वळ नेत्यांना खूष करण्यासाठीच ठराव जाहीर करण्याची तसदी घेतल्याची चर्चा आहे.यापूर्वीही असा प्रकारकसबा बावड्यातील एका पेट्रोल पंपाजवळील रिकाम्या जागेवर अशाच प्रकारे आरक्षणाचा ठराव आणण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पडद्यामागे जोरदार हालचाली झाल्या. मात्र, ‘वजन’ ठेवल्यानंतरच ठराव मागे घेण्यात आला. आरक्षण उठवता येत नाही, तर आरक्षण टाकण्याची भीती दाखवून इप्सित साध्य करण्याची ही नवीन टूम आहे.मध्यभागीच बागदक्षिण-उत्तर अशी एकूण दहा एकर असलेल्या या जागेच्या मध्यभागीच उत्तरेच्या बाजूने दोन एकर जागेवर बगीचा करण्याचा ठराव प्रस्तावित आहे. जेणेकरून बैलगाडीसाठी जाणारी वाटही बंद होऊन उर्वरित जागेचा वापर कारखान्यास करता येऊ नये, अशा पद्धतीनेच ठराव आणला आहे.कारखाना अगोदरच अत्यंत दाटीवाटीच्या जागेत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, या उद्देशानेच कारखान्याने ही जागा घेतली. वास्तविक ही जागा १५ हजार सभासदांची आहे. अशा प्रकारे कारखाना मोडीत काढण्याचा कोणी डाव आखत असल्यास शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना संबंधितांना करावा लागेल. - दिलीप पाटील (चेअरमन, राजाराम कारखाना)