शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

स्वच्छ शहराचा संकल्प : दोन बायोगॅस, तर एक खत निर्मिती प्रकल्प साकारणार

भारत चव्हाण --कोल्हापूर --शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, त्यातून दैनंदिन कचऱ्याचा बनलेला गंभीर प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने २०१७ या नवीन वर्षात ‘स्वच्छ शहर’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत शहरातील कसबा बावडा परिसरातील विघटन न होणाऱ्या कचऱ्याचे ढीग संपलेले पाहायला मिळणार आहेत. झूम प्रकल्पावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्पासह उपनगरांतील कचऱ्यावर दोन बायोगॅस प्रकल्प, तर एक खतनिर्मिती प्रकल्प लवकरच साकारणार आहे. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पावर साचलेला कचरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे. आजमितीस या ठिकाणी अडीच लाख टन विघटन न होणारा कचरा (इनर्ट मटेरिअल) साचून राहिलेला आहे. इनर्ट मटेरिअल टाकण्यासाठी टोप येथील खाण उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे; परंतु आता शहरातीलच टाकाळा खाणीत हा सर्व विघटन न होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. कचरा उठाव अभियान राबवून तो झूम प्रकल्पाची साईट रिकामी केली जाणार आहे. झूमवर ऊर्जानिर्मितीझूमची जागा रिकामी झाली की त्या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईस्थित रोकेम संस्थेला काम देण्यात आले आहे. महानगरपालिका ‘रोकेम’ला शहरातील दररोजचा कचरा अंदाजे १५० टन देणार असून, कंपनी त्यावर विजेची निर्मिती करणार आहे. नवीन वर्षात कचरा उठावाचे कालबद्ध अभियान राबविले जाणार आहे.बायोगॅस प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्णउपनगर भागातील चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा तो एका ठिकाणी साठविण्यात येणार आहे. तेथेच त्यावर प्रक्रिया केली जाईल. पाच ते सात हजार स्क्वेअर फूट जागेवर दोन छोटे बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. साधारण दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, वर्क आॅर्डरची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पुईखडी येथील एक जागा निश्चित केली आहे; तर दुसऱ्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कचऱ्यावर गॅस आणि गॅसचा वापर करून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. मैलखड्डा येथे खतनिर्मिती संभाजीनगर ते जरगनगर रस्त्यावर असलेल्या मैलखड्डा परिसरात खतनिर्मितीचा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपनी स्वखर्चाने उभा करणार असून, महानगरपालिका फक्त त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यास सुरुवात होईल. नजीकच्या चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा करून तो दिला जाणार आहे.