शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

स्वच्छ शहराचा संकल्प : दोन बायोगॅस, तर एक खत निर्मिती प्रकल्प साकारणार

भारत चव्हाण --कोल्हापूर --शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, त्यातून दैनंदिन कचऱ्याचा बनलेला गंभीर प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने २०१७ या नवीन वर्षात ‘स्वच्छ शहर’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत शहरातील कसबा बावडा परिसरातील विघटन न होणाऱ्या कचऱ्याचे ढीग संपलेले पाहायला मिळणार आहेत. झूम प्रकल्पावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्पासह उपनगरांतील कचऱ्यावर दोन बायोगॅस प्रकल्प, तर एक खतनिर्मिती प्रकल्प लवकरच साकारणार आहे. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पावर साचलेला कचरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे. आजमितीस या ठिकाणी अडीच लाख टन विघटन न होणारा कचरा (इनर्ट मटेरिअल) साचून राहिलेला आहे. इनर्ट मटेरिअल टाकण्यासाठी टोप येथील खाण उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे; परंतु आता शहरातीलच टाकाळा खाणीत हा सर्व विघटन न होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. कचरा उठाव अभियान राबवून तो झूम प्रकल्पाची साईट रिकामी केली जाणार आहे. झूमवर ऊर्जानिर्मितीझूमची जागा रिकामी झाली की त्या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईस्थित रोकेम संस्थेला काम देण्यात आले आहे. महानगरपालिका ‘रोकेम’ला शहरातील दररोजचा कचरा अंदाजे १५० टन देणार असून, कंपनी त्यावर विजेची निर्मिती करणार आहे. नवीन वर्षात कचरा उठावाचे कालबद्ध अभियान राबविले जाणार आहे.बायोगॅस प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्णउपनगर भागातील चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा तो एका ठिकाणी साठविण्यात येणार आहे. तेथेच त्यावर प्रक्रिया केली जाईल. पाच ते सात हजार स्क्वेअर फूट जागेवर दोन छोटे बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. साधारण दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, वर्क आॅर्डरची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पुईखडी येथील एक जागा निश्चित केली आहे; तर दुसऱ्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कचऱ्यावर गॅस आणि गॅसचा वापर करून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. मैलखड्डा येथे खतनिर्मिती संभाजीनगर ते जरगनगर रस्त्यावर असलेल्या मैलखड्डा परिसरात खतनिर्मितीचा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपनी स्वखर्चाने उभा करणार असून, महानगरपालिका फक्त त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यास सुरुवात होईल. नजीकच्या चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा करून तो दिला जाणार आहे.