शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडी पाझर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

शासनाचे दुर्लक्ष : भरावातून होते पाणी गळती; लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही

शिवराज लोंढे - सावरवाडी -लाभक्षेत्राला पाणीपुरवठा होण्याकडे झालेले दुर्लक्ष, पाणी साठविण्याची कमी क्षमता, भरावातून होणारी पाण्याची गळती, पाच वर्षांपासून राज्य शासनाचे तलावाच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष, शेतीस अपुरा होणारा पाणीपुरवठा, पिकांचे होणारे नुकसान या समस्यांत सापडलेल्या गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासकीय पातळीवर निधी अद्याप उपलब्ध नाही.राज्य शासनाने १२ वर्षांपूर्वी गणेशवाडीत डोंगरी भागात या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावाची उंची १४.८७ मीटर आहे. तलावाचे लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे.तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. त्यातच आठ वर्षांपासून तलावाच्या मुख्य भरावातून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा होत नाही. त्यासाठी या पाझर तलावाच्या सभोवार नव्याने खुदाई करून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आणणे शक्य आहे. या पाझर तलावात कपडे, जनावरे धुतली जातात. पाझर तलावाच्या परिसरात मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलाव परिसर दारू पिण्याचा अड्डा बनला आहे.भविष्यात जादा पाणीपुरवठा होण्यासाठी या पाझर तलावाच्या दुरुस्तीसह रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. परंतु, ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाया जाते. मुख्य भराव्याच्या गळतीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मिळत नाही. तो तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.डोंगरी भागातील कोरडवाहू जमिनीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागतात. शासनाने पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जादा निधी मंजूर करावा.- सिंधुताई माने, सरपंच, ग्रामपंचायत गणेशवाडीगेल्या अनेक वर्षांपासून भरावातून गळती होते. पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यासाठी भरावाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.- दादासाहेब लाड, संचालक, कुंभी-कासारी साखर कारखाना.