शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

गणेशवाडी पाझर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

शासनाचे दुर्लक्ष : भरावातून होते पाणी गळती; लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही

शिवराज लोंढे - सावरवाडी -लाभक्षेत्राला पाणीपुरवठा होण्याकडे झालेले दुर्लक्ष, पाणी साठविण्याची कमी क्षमता, भरावातून होणारी पाण्याची गळती, पाच वर्षांपासून राज्य शासनाचे तलावाच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष, शेतीस अपुरा होणारा पाणीपुरवठा, पिकांचे होणारे नुकसान या समस्यांत सापडलेल्या गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासकीय पातळीवर निधी अद्याप उपलब्ध नाही.राज्य शासनाने १२ वर्षांपूर्वी गणेशवाडीत डोंगरी भागात या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावाची उंची १४.८७ मीटर आहे. तलावाचे लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे.तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. त्यातच आठ वर्षांपासून तलावाच्या मुख्य भरावातून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा होत नाही. त्यासाठी या पाझर तलावाच्या सभोवार नव्याने खुदाई करून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आणणे शक्य आहे. या पाझर तलावात कपडे, जनावरे धुतली जातात. पाझर तलावाच्या परिसरात मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलाव परिसर दारू पिण्याचा अड्डा बनला आहे.भविष्यात जादा पाणीपुरवठा होण्यासाठी या पाझर तलावाच्या दुरुस्तीसह रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. परंतु, ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाया जाते. मुख्य भराव्याच्या गळतीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मिळत नाही. तो तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.डोंगरी भागातील कोरडवाहू जमिनीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागतात. शासनाने पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जादा निधी मंजूर करावा.- सिंधुताई माने, सरपंच, ग्रामपंचायत गणेशवाडीगेल्या अनेक वर्षांपासून भरावातून गळती होते. पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यासाठी भरावाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.- दादासाहेब लाड, संचालक, कुंभी-कासारी साखर कारखाना.