शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

गणेशवाडी पाझर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

शासनाचे दुर्लक्ष : भरावातून होते पाणी गळती; लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही

शिवराज लोंढे - सावरवाडी -लाभक्षेत्राला पाणीपुरवठा होण्याकडे झालेले दुर्लक्ष, पाणी साठविण्याची कमी क्षमता, भरावातून होणारी पाण्याची गळती, पाच वर्षांपासून राज्य शासनाचे तलावाच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष, शेतीस अपुरा होणारा पाणीपुरवठा, पिकांचे होणारे नुकसान या समस्यांत सापडलेल्या गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासकीय पातळीवर निधी अद्याप उपलब्ध नाही.राज्य शासनाने १२ वर्षांपूर्वी गणेशवाडीत डोंगरी भागात या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावाची उंची १४.८७ मीटर आहे. तलावाचे लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे.तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. त्यातच आठ वर्षांपासून तलावाच्या मुख्य भरावातून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा होत नाही. त्यासाठी या पाझर तलावाच्या सभोवार नव्याने खुदाई करून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आणणे शक्य आहे. या पाझर तलावात कपडे, जनावरे धुतली जातात. पाझर तलावाच्या परिसरात मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलाव परिसर दारू पिण्याचा अड्डा बनला आहे.भविष्यात जादा पाणीपुरवठा होण्यासाठी या पाझर तलावाच्या दुरुस्तीसह रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. परंतु, ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाया जाते. मुख्य भराव्याच्या गळतीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मिळत नाही. तो तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.डोंगरी भागातील कोरडवाहू जमिनीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागतात. शासनाने पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जादा निधी मंजूर करावा.- सिंधुताई माने, सरपंच, ग्रामपंचायत गणेशवाडीगेल्या अनेक वर्षांपासून भरावातून गळती होते. पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यासाठी भरावाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.- दादासाहेब लाड, संचालक, कुंभी-कासारी साखर कारखाना.