शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

समतेचा संदेश देणारा यमगेतील सरनोबतांचा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST

शेकडो वर्षांची परंपरा अनिल पाटील मुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना, सण-समारंभांमधून एकत्र येण्याची वृत्ती ...

शेकडो वर्षांची परंपरा

अनिल पाटील

मुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना, सण-समारंभांमधून एकत्र येण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत आहे; पण याला अपवाद कागल तालुक्यातील यमगे या गावातील सरनोबत कुटुंब आहे. शेकडो वर्षांपासून सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या या कुटुंबात एकच गणपती बसवला जातो. सर्व धार्मिक विधी सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात साजरे करत आहेत. समतेचा, एकतेचा संदेश देणारा सरनोबतांचा गणपती विभक्त कुटुंब व्यवस्थेला नक्कीच मार्गदर्शक आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात लोकांनी एकत्र यावे, आचार-विचारांची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली; पण वेगाने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत हा मूळ हेतू मात्र दूर जाताना पाहावयास मिळत आहे. पण याच विचाराने यमगे येथील सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवातीपासूनच सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या कुटुंबामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेले काही लोक गणेश उत्सवामध्ये एकत्र येतात.

सरनोबत गल्ली येथील सदाशिव दत्तात्रय सरनोबत पाटील यांच्या घरी अगदी विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातीलच कुंभार समाजाकडून धान्य देऊन तीन ते चार फुटाची शाडूची आकर्षक मूर्ती बनवून घेतली जाते. गणेशाच्या आगमनासाठी सुमारे पन्नास ते साठजण एकत्रित गणेशाचा जयजयकार करत जाऊन डोक्यावरून गणेश मूर्ती आणतात. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत घरातील सर्वच सदस्य एकत्र येत अत्यंत उत्साहात आरती करतात. यावेळी आणलेल्या प्रसादामध्येसुद्धा विविधता पाहावयास मिळते. गावातील तलावात अगदी साध्या पद्धतीने या गणपतीचे विसर्जन होते.