शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

By admin | Updated: May 5, 2017 23:14 IST

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

श्रीनिवास नागेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापुरातील मोर्चाला सदाभाऊ खोत येणार नाहीत, ही भाकड भाकितं खोटी ठरली. नव्हे, सदाभाऊंनी ती खोटी ठरवली. ते अलीकडं पक्के राजकारणी बनलेत. कुठं जायचं अन् कुठं जायचं नाही, हे त्यांना मुरब्बी नेत्याप्रमाणं पक्कं कळतंय. खासदार राजू शेट्टींनी आष्ट्यात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यास दांडी मारल्यानंतर अन् शेट्टींनी अप्रत्यक्षपणे (हातचा राखून!) तोफा डागल्यानंतर संघटनेत निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी ओळखलीय. त्यातच त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल, तर ते मोर्चासाठी येतील, असा ‘अल्टिमेटम’ खासदार शेट्टींनी मोर्चाच्या दोन दिवस आधी दिला. त्यामुळं सदाभाऊ खास मोर्चासाठी मुंबईहून आले. मोर्चात सामील झाले आणि तडाखेबंद भाषण ठोकून निघून गेले. ‘मिसरूड फुटायच्या आधीपासून मी संघटनेत काम करतोय. परंतु दाढी-मिशा फुटल्यानंतर संघटनेत आलेले माझ्याबद्दल शंका घेताहेत. कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर शेतकऱ्यांमुळं मंत्री बनलोय’, असं खुद्द शेट्टींसमोर सुनावणाऱ्या सदाभाऊंचा रोख कुणाकडं होता, हे तिथं जमलेल्यांना तर नक्कीच कळलं असणार. शेट्टी यांच्या सूचक इशाऱ्यांना दिलेलं ते चोख उत्तर होतं. गेल्या तीन-चार महिन्यांपासून दोघांतला कलगीतुरा अनेक प्रसंगांतून चव्हाट्यावर आलाय. विशेष म्हणजे नंतर हळूच सावरासावर केली जाते. (ती राजकीय अपरिहार्यता.) अर्थात कितीही गुंडाळागुंडाळी केली असली तरी दोघांतला बेबनाव लोकांच्या नजरेतून सुटलेला नाही.चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष विधिमंडळात प्रश्न मांडून, सत्तेत जाऊनच चळवळीचे प्रश्न सोडवून घ्यावे लागतात. त्यासाठी खासदार शेट्टी यांनी केंद्रातल्या भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातही त्यांचा पक्ष भाजप सरकारचा घटकपक्ष आहे. त्यातूनच सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद मिळालंय. कृषी, पणन, आरोग्य, पाणीपुरवठा अशी चार-चार खाती ते सांभाळताहेत. अर्थात त्यासाठी भाजपच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागल्या अन् किती आदळआपट करावी लागली, हे सारा महाराष्ट्र जाणतो! घटकपक्षांना चुचकारायचं, जवळ घ्यायचं अन् संधी मिळाली की, तो पक्षच संपवायचा, ही भाजपची खेळी शेट्टी यांनी ओळखलीय, पण सत्तासुंदरीला भुललेल्या सदाभाऊंना ते अजून समजलेलं नाही, असं संघटनेतला एक प्रवाह म्हणतो... त्यावर मात्र सदाभाऊ शांत बसतात. नव्हे, सरकारची भलावण करतात. हल्ली तर भाजप सरकारचं प्रवक्तेपद मिळाल्यासारखी सदाभाऊंची भाषणं असतात. अर्थात ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’, असं काय उगाच म्हणतात?आपण भुलून भाजपवाल्यांच्या मागं गेल्याचं, परंतु वाट्याला मात्र कडकडीत ऊन आल्याचं गुरुवारी कोल्हापुरातल्या मोर्चात शेट्टींनी कबूल केलं. मात्र मोर्चाला येण्यापूर्वी म्हणे सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली! शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करायचं आहे, असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी (हळूच कानात) सांगितलं म्हणे! त्याउपरही खासदार शेट्टींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २२ मेपासून पुणे ते राजभवन अशी आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचं जाहीर केलं. सदाभाऊंचं सरकारात वजन आहे अन् सरकारवर एवढा दांडगा विश्वास आहे, तर मग त्यांनी खा२२सदार शेट्टींना थांबवून दाखवावं. (खरं तर आंदोलन जाहीर करण्यापासूनच त्यांनी शेट्टींना रोखलं का नाही?) अन्यथा सदाभाऊ हे एक सामान्य राज्यमंत्री असून, त्यांना मर्यादित अधिकार आहेत, ते शेतकऱ्यांबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत, हे खासदार शेट्टींचं म्हणणं मुकाट्यानं मान्य करून सदाभाऊंनी सरकारचा उदोउदो थांबवावा. (ते सरकारचा उदोउदो करतात, हे शेट्टींचंच म्हणणं हं!) ... पण असं करतील ते सदाभाऊ कसले! आंदोलनात काठ्या खाल्ल्यामुळं, डोकी फोडून घेतल्यामुळं, जेलमध्ये गेल्यामुळं ते शेतकऱ्यांचे ‘नेते’ बनलेत. एवढं राबराब राबून केलेल्या मशागतीनंतर त्या जमिनीत पीक (मंत्रीपद अन् त्याचे लाभ!) घ्यायची वेळ आल्यावर हातातला कोयता खाली ठेवायचा का? अन् ते भरघोस पीक घेऊ देणाऱ्या भाजपला शिव्या घालून काडीमोड घ्यावा का?जाता-जाता : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बागणी मतदारसंघातून सदाभाऊंचा मुलगा सागरच्या पदरी पराभव पडला. तो पडण्यामागं खासदार शेट्टींचा विरोध, हेही एक कारण होतं. सागरला उभा करताच शेट्टींनी घराणेशाहीचे दाखले देत सदाभाऊंना कानपिचक्या दिल्या होत्या. पण सदाभाऊंनी त्यावेळीही ‘मशागत अन् पीक काढणी’चा सवाल केला होता. मात्र त्यानंतर शेट्टी तिथं प्रचाराला गेले नव्हते. (शेजारच्या मतदारसंघात मात्र त्यांनी सभा घेतल्या.) त्यामुळं सदाभाऊ खप्पा झाले. शिवाय ज्या गावांत लोकसभेला शेट्टींना पाच-सहाशे मतांचं ‘लीड’ मिळतं, जिथल्या ग्रामपंचायतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सदस्य आहेत, त्या गावांमध्ये सागर दोन-दोनशे मतांनी कसा मागं पडतो, हा सवाल त्यांचं मन कुरतडतोय. पण शेट्टींना विचारायचं धारिष्ट्य सदाभाऊ दाखवू शकत नाहीत... कारण ते कधीचेच भाजपच्या ‘पोळी’चे भागीदार बनलेत!ताजा कलम : सदाभाऊंचा सरकारातला व्याप पाहून (की पावलं ओळखून?) खासदार शेट्टींनी त्यांना संघटनेच्या सर्व पदांतून मुक्त केलंय. प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रकाश पोकळे यांनी निवड केलीय. मागंही एकदा सदाभाऊंना प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं... (पण नंतर ते कधी प्रदेशाध्यक्ष झाले, की आणखी कुणाला अध्यक्ष केलं, हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.) ‘सांगताही येईना अन् सहनही होईना’, या अवस्थेच्या पुढं गेल्यानंतरच असा निर्णय होत असावा बहुधा!