शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

By admin | Updated: May 5, 2017 23:14 IST

ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी!

श्रीनिवास नागेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापुरातील मोर्चाला सदाभाऊ खोत येणार नाहीत, ही भाकड भाकितं खोटी ठरली. नव्हे, सदाभाऊंनी ती खोटी ठरवली. ते अलीकडं पक्के राजकारणी बनलेत. कुठं जायचं अन् कुठं जायचं नाही, हे त्यांना मुरब्बी नेत्याप्रमाणं पक्कं कळतंय. खासदार राजू शेट्टींनी आष्ट्यात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यास दांडी मारल्यानंतर अन् शेट्टींनी अप्रत्यक्षपणे (हातचा राखून!) तोफा डागल्यानंतर संघटनेत निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी ओळखलीय. त्यातच त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल, तर ते मोर्चासाठी येतील, असा ‘अल्टिमेटम’ खासदार शेट्टींनी मोर्चाच्या दोन दिवस आधी दिला. त्यामुळं सदाभाऊ खास मोर्चासाठी मुंबईहून आले. मोर्चात सामील झाले आणि तडाखेबंद भाषण ठोकून निघून गेले. ‘मिसरूड फुटायच्या आधीपासून मी संघटनेत काम करतोय. परंतु दाढी-मिशा फुटल्यानंतर संघटनेत आलेले माझ्याबद्दल शंका घेताहेत. कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर शेतकऱ्यांमुळं मंत्री बनलोय’, असं खुद्द शेट्टींसमोर सुनावणाऱ्या सदाभाऊंचा रोख कुणाकडं होता, हे तिथं जमलेल्यांना तर नक्कीच कळलं असणार. शेट्टी यांच्या सूचक इशाऱ्यांना दिलेलं ते चोख उत्तर होतं. गेल्या तीन-चार महिन्यांपासून दोघांतला कलगीतुरा अनेक प्रसंगांतून चव्हाट्यावर आलाय. विशेष म्हणजे नंतर हळूच सावरासावर केली जाते. (ती राजकीय अपरिहार्यता.) अर्थात कितीही गुंडाळागुंडाळी केली असली तरी दोघांतला बेबनाव लोकांच्या नजरेतून सुटलेला नाही.चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष विधिमंडळात प्रश्न मांडून, सत्तेत जाऊनच चळवळीचे प्रश्न सोडवून घ्यावे लागतात. त्यासाठी खासदार शेट्टी यांनी केंद्रातल्या भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातही त्यांचा पक्ष भाजप सरकारचा घटकपक्ष आहे. त्यातूनच सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद मिळालंय. कृषी, पणन, आरोग्य, पाणीपुरवठा अशी चार-चार खाती ते सांभाळताहेत. अर्थात त्यासाठी भाजपच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागल्या अन् किती आदळआपट करावी लागली, हे सारा महाराष्ट्र जाणतो! घटकपक्षांना चुचकारायचं, जवळ घ्यायचं अन् संधी मिळाली की, तो पक्षच संपवायचा, ही भाजपची खेळी शेट्टी यांनी ओळखलीय, पण सत्तासुंदरीला भुललेल्या सदाभाऊंना ते अजून समजलेलं नाही, असं संघटनेतला एक प्रवाह म्हणतो... त्यावर मात्र सदाभाऊ शांत बसतात. नव्हे, सरकारची भलावण करतात. हल्ली तर भाजप सरकारचं प्रवक्तेपद मिळाल्यासारखी सदाभाऊंची भाषणं असतात. अर्थात ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’, असं काय उगाच म्हणतात?आपण भुलून भाजपवाल्यांच्या मागं गेल्याचं, परंतु वाट्याला मात्र कडकडीत ऊन आल्याचं गुरुवारी कोल्हापुरातल्या मोर्चात शेट्टींनी कबूल केलं. मात्र मोर्चाला येण्यापूर्वी म्हणे सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली! शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करायचं आहे, असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी (हळूच कानात) सांगितलं म्हणे! त्याउपरही खासदार शेट्टींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २२ मेपासून पुणे ते राजभवन अशी आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचं जाहीर केलं. सदाभाऊंचं सरकारात वजन आहे अन् सरकारवर एवढा दांडगा विश्वास आहे, तर मग त्यांनी खा२२सदार शेट्टींना थांबवून दाखवावं. (खरं तर आंदोलन जाहीर करण्यापासूनच त्यांनी शेट्टींना रोखलं का नाही?) अन्यथा सदाभाऊ हे एक सामान्य राज्यमंत्री असून, त्यांना मर्यादित अधिकार आहेत, ते शेतकऱ्यांबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत, हे खासदार शेट्टींचं म्हणणं मुकाट्यानं मान्य करून सदाभाऊंनी सरकारचा उदोउदो थांबवावा. (ते सरकारचा उदोउदो करतात, हे शेट्टींचंच म्हणणं हं!) ... पण असं करतील ते सदाभाऊ कसले! आंदोलनात काठ्या खाल्ल्यामुळं, डोकी फोडून घेतल्यामुळं, जेलमध्ये गेल्यामुळं ते शेतकऱ्यांचे ‘नेते’ बनलेत. एवढं राबराब राबून केलेल्या मशागतीनंतर त्या जमिनीत पीक (मंत्रीपद अन् त्याचे लाभ!) घ्यायची वेळ आल्यावर हातातला कोयता खाली ठेवायचा का? अन् ते भरघोस पीक घेऊ देणाऱ्या भाजपला शिव्या घालून काडीमोड घ्यावा का?जाता-जाता : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बागणी मतदारसंघातून सदाभाऊंचा मुलगा सागरच्या पदरी पराभव पडला. तो पडण्यामागं खासदार शेट्टींचा विरोध, हेही एक कारण होतं. सागरला उभा करताच शेट्टींनी घराणेशाहीचे दाखले देत सदाभाऊंना कानपिचक्या दिल्या होत्या. पण सदाभाऊंनी त्यावेळीही ‘मशागत अन् पीक काढणी’चा सवाल केला होता. मात्र त्यानंतर शेट्टी तिथं प्रचाराला गेले नव्हते. (शेजारच्या मतदारसंघात मात्र त्यांनी सभा घेतल्या.) त्यामुळं सदाभाऊ खप्पा झाले. शिवाय ज्या गावांत लोकसभेला शेट्टींना पाच-सहाशे मतांचं ‘लीड’ मिळतं, जिथल्या ग्रामपंचायतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सदस्य आहेत, त्या गावांमध्ये सागर दोन-दोनशे मतांनी कसा मागं पडतो, हा सवाल त्यांचं मन कुरतडतोय. पण शेट्टींना विचारायचं धारिष्ट्य सदाभाऊ दाखवू शकत नाहीत... कारण ते कधीचेच भाजपच्या ‘पोळी’चे भागीदार बनलेत!ताजा कलम : सदाभाऊंचा सरकारातला व्याप पाहून (की पावलं ओळखून?) खासदार शेट्टींनी त्यांना संघटनेच्या सर्व पदांतून मुक्त केलंय. प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रकाश पोकळे यांनी निवड केलीय. मागंही एकदा सदाभाऊंना प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं... (पण नंतर ते कधी प्रदेशाध्यक्ष झाले, की आणखी कुणाला अध्यक्ष केलं, हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.) ‘सांगताही येईना अन् सहनही होईना’, या अवस्थेच्या पुढं गेल्यानंतरच असा निर्णय होत असावा बहुधा!