शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

कारवाईसाठी उपोषण : पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, दबाबापोटी दोषींवर थेट कारवाई नाही

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -गगनबावडा ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार व नियमबाह्य कामे केल्याचे वेळोवेळी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सन २००९ पासून तेथील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परंतु, दबावाला बळी पडून दोषींवर थेट कारवाई न करता अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत. त्यामुळे नुकतेच काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.ग्रामपंचायत गट नंबर ६, ३४, ३५ व मुलकीपड गट नंबर ५ मधील झाडे तत्कालीन ‘कारभाऱ्यां’नी सन २००९ मध्ये तोडण्याची प्रक्रिया राबविली. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मे २०१० मध्ये कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीपेक्षा ७० ते ८० टक्के जादा वृक्षतोड केली. तसेच वृक्षतोड करण्यापूर्वी लिलावाची रक्कम ९३ हजार रुपये भरून घेतलेले नाहीत. परिणामी, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे बोगस लिलाव विक्री व बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे.सरकारी जागेमध्ये घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून गगनबावडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी करून तो चौकशी अहवाल २१ जून २०१४ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीशी ११ महिन्यांचा भाडेपट्टीचा करार १०० रुपयांच्या साध्या मुद्रांकावर करूनही संजय वरेकर, अमर पाटील, रेश्मा हवलदार, अविनाश संकपाळ यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ५७७ मधील जुन्या नळ पाणीपुरवठा विहिरीजवळील जागेमध्ये पक्की बांधकामाची घरे बांधली आहेत; परंतु या चौघांनी ग्रामपंचायतीसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. भाडेपट्टीने दिलेल्या जागेवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विरोध केला नाही. सार्वजनिक शौचालयालगतच संजय वरेकर यांनी नागरिकांना येता-जाता येणार नाही, अशाप्रकारे घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. उत्पन्नातील १५ टक्के वाटा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, सन २००८-०९ ते २०१२-१३ अखेर ग्रामपंचायतीने ज्या-त्या वर्षी निधी खर्च केलेला नाही. मागासवर्गीयांनाच विकासापासून वंचित ठेवले असून, बोगस, पोकळ खर्च दाखवून अपहार केला आहे. (पुर्वार्ध )गेली काही वर्षे गगनबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे. नळ पाणीपुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाई त्वरित करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडून आठ दिवसांची मुदत दिली आहे.- गिरीश प्रभूलकर, तक्रारदार.तपासणीत ठेवल्या त्रुटी...उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कारभाराची तपासणी केली. तपासणीत ग्रामपंचायतीने करवसुली नमुना नंबर ९ प्रमाणे सर्व खातेदारांना मागणी बिले १२९/१ लागू केलेली नाहीत. करवसुली एकूण मागणी रक्कम ६ लाख ७६ हजार ३५० आहे. मात्र, १९ टक्के इतकीच करवसुली झाली आहे. मासिक सभा इतिवृत्त २०१४ पर्यंत लिहिले आहे; पण त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नाहीत. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याचे इतिवृत्त लिहिलेले नाही. वर्षनिहाय दप्तराचे अ, ब, क, ड मध्ये अभिलेख वर्गीकरण केलेले नाही. तसेच ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर १ ते २७ मधील नवीन नमुन्यामध्ये दप्तर ठेवलेले नाही