शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

कारवाईसाठी उपोषण : पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, दबाबापोटी दोषींवर थेट कारवाई नाही

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -गगनबावडा ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार व नियमबाह्य कामे केल्याचे वेळोवेळी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सन २००९ पासून तेथील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परंतु, दबावाला बळी पडून दोषींवर थेट कारवाई न करता अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत. त्यामुळे नुकतेच काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.ग्रामपंचायत गट नंबर ६, ३४, ३५ व मुलकीपड गट नंबर ५ मधील झाडे तत्कालीन ‘कारभाऱ्यां’नी सन २००९ मध्ये तोडण्याची प्रक्रिया राबविली. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मे २०१० मध्ये कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीपेक्षा ७० ते ८० टक्के जादा वृक्षतोड केली. तसेच वृक्षतोड करण्यापूर्वी लिलावाची रक्कम ९३ हजार रुपये भरून घेतलेले नाहीत. परिणामी, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे बोगस लिलाव विक्री व बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे.सरकारी जागेमध्ये घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून गगनबावडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी करून तो चौकशी अहवाल २१ जून २०१४ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीशी ११ महिन्यांचा भाडेपट्टीचा करार १०० रुपयांच्या साध्या मुद्रांकावर करूनही संजय वरेकर, अमर पाटील, रेश्मा हवलदार, अविनाश संकपाळ यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ५७७ मधील जुन्या नळ पाणीपुरवठा विहिरीजवळील जागेमध्ये पक्की बांधकामाची घरे बांधली आहेत; परंतु या चौघांनी ग्रामपंचायतीसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. भाडेपट्टीने दिलेल्या जागेवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विरोध केला नाही. सार्वजनिक शौचालयालगतच संजय वरेकर यांनी नागरिकांना येता-जाता येणार नाही, अशाप्रकारे घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. उत्पन्नातील १५ टक्के वाटा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, सन २००८-०९ ते २०१२-१३ अखेर ग्रामपंचायतीने ज्या-त्या वर्षी निधी खर्च केलेला नाही. मागासवर्गीयांनाच विकासापासून वंचित ठेवले असून, बोगस, पोकळ खर्च दाखवून अपहार केला आहे. (पुर्वार्ध )गेली काही वर्षे गगनबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे. नळ पाणीपुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाई त्वरित करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडून आठ दिवसांची मुदत दिली आहे.- गिरीश प्रभूलकर, तक्रारदार.तपासणीत ठेवल्या त्रुटी...उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कारभाराची तपासणी केली. तपासणीत ग्रामपंचायतीने करवसुली नमुना नंबर ९ प्रमाणे सर्व खातेदारांना मागणी बिले १२९/१ लागू केलेली नाहीत. करवसुली एकूण मागणी रक्कम ६ लाख ७६ हजार ३५० आहे. मात्र, १९ टक्के इतकीच करवसुली झाली आहे. मासिक सभा इतिवृत्त २०१४ पर्यंत लिहिले आहे; पण त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नाहीत. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याचे इतिवृत्त लिहिलेले नाही. वर्षनिहाय दप्तराचे अ, ब, क, ड मध्ये अभिलेख वर्गीकरण केलेले नाही. तसेच ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर १ ते २७ मधील नवीन नमुन्यामध्ये दप्तर ठेवलेले नाही