शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गडहिंग्लज'च्या संचालकांचे मुश्रीफांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीने कारखाना सोडू नये आणि सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न निकाली काढावा यासाठी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी ...

गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीने कारखाना सोडू नये आणि सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न निकाली काढावा यासाठी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी आणि विरोधी संचालकांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आज (शुक्रवारी) साकडे घातले.

कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, विरोधी आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालकांनी कागलच्या शासकीय विश्रामगृहात मुश्रीफांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे उपस्थित नव्हते. ‘ब्रिस्क’ परत गेल्यास कारखाना बंद पडून शेतकरी, कामगार आणि कारखान्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह सेवानिवृत्त कामगारांच्या देणीसंदर्भातील प्रस्ताव कंपनीने दिल्यास त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेता येईल; परंतु ऐनवेळी कंपनीने कारखाना सोडू नये, अशी विनंती करण्यात आली. तथापि, केवळ साखरेच्या उत्पादनावर कारखाना चालविणे कठीण असून कराराबाहेरील खर्चामुळे कंपनी तोट्यात आहे. कंपनीची मानसिकता नसल्यामुळे कारखान्याने नवा पर्याय शोधावा, लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वप्रकारची मदत करू, अशी ग्वाही मुश्रीफांनी दिली.

दरम्यान, सेवानिवृत्त चार कामगारांच्या आमरण उपोषणाचा आज (शुक्रवारी) दुसरा दिवस होता. त्याला सर्व श्रमिक महासंघातर्फे कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी पाठिंबा दिला.