शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गडहिंग्लज कारखान्यात ‘राष्ट्रवादीचा पुनर्प्रवेश’!

By admin | Updated: April 1, 2016 01:29 IST

दशकानंतर संधी : सत्ताधारी आघाडीत पाच कार्यकर्त्यांचा समावेश--गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक

राम मगदूम -- गडहिंग्लज  तब्बल दशकानंतर गडहिंग्लज साखर कारखान्यात ‘राष्ट्रवादी’चा पुनर्प्रवेश झाला आहे. केवळ प्रवेशच नव्हे, तर कारखान्याच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.१९८८ च्या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक स्व. आप्पासाहेब नलवडे यांच्या विरोधात शिंदे-कुपेकर-हत्तरकी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर होऊन कुपेकर गटाचा कारखान्यात पहिल्यांदाच प्रवेश झाला. त्यानंतर कुपेकर गटाचे डॉ. शरदचंद्र तथा कुमार शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे आली. १९९३ च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांना हटविण्यासाठी नलवडे-कुपेकर एकत्र आले. त्यानंतरही कुपेकर गटाच्याच डॉ. प्रकाश शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांनी विधानसभेला बाबा कुपेकर यांनाच आव्हान दिले. २००० च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांना हटविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘शिंदे-कुपेकर’ आघाडीने बाजी मारली. त्यानंतर अध्यक्षपदी शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी कुपेकर गटाच्या प्रकाश चव्हाण यांची निवड झाली. दरम्यान, चव्हाण यांनीदेखील विधानसभेला कुपेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली. २००५ च्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे-चव्हाण-हत्तरकी आघाडीच्या विरोधात कुपेकर व शहापूकर गट असा तिरंगी सामना झाला. विधानसभेच्या अध्यक्षपदावर असतानाही कुपेकर यांनी कारखान्याची निवडणूक लढविली. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलला दारुण पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून या निवडणुकीपर्यंत कारखान्यात राष्ट्रवादीचा एकही संचालक नव्हता. तथापि, बदलत्या राजकारणाचा वेध घेत आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष शिंदे यांच्याशी युती केली. त्यामुळेच मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे यांच्या आघाडीला कारखान्याची सत्ता मिळाली. संचालक मंडळाच्या १९ पैकी ११ जागा या आघाडीला मिळाल्या. त्यात राष्ट्रवादीचे पाच संचालक आहेत.स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीतदेखील आमदार मुश्रीफ यांनी संध्यादेवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ दिले. किंबहुना, त्यामुळेच गडहिंग्लज कारखान्यात राष्ट्रवादीचा दमदार पुनर्प्रवेश झाला आहे.आमदार मुश्रीफ व कुपेकर यांचा मुत्सद्दीपणा व बेरजेच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीला तब्बल दहा वर्षांनंतर कारखान्यात पुनर्प्रवेश मिळाला आहे. सत्ताधारी ‘मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे’ आघाडीत सर्वाधिक पाच संचालक राष्ट्रवादीचे आहेत. मुश्रीफ-शिंदे-कुपेकर यांना एकत्र आणण्यात जयसिंग चव्हाण, सतीश पाटील व अमर चव्हाण यांनी भूमिका बजावली. प्रसंगी पत्नीची उमेदवारी मागे घेऊन जयकुमार मुन्नोळी यांनीही त्यांना मोलाची साथ दिली.