शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखान्यात ‘राष्ट्रवादीचा पुनर्प्रवेश’!

By admin | Updated: April 1, 2016 01:29 IST

दशकानंतर संधी : सत्ताधारी आघाडीत पाच कार्यकर्त्यांचा समावेश--गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक

राम मगदूम -- गडहिंग्लज  तब्बल दशकानंतर गडहिंग्लज साखर कारखान्यात ‘राष्ट्रवादी’चा पुनर्प्रवेश झाला आहे. केवळ प्रवेशच नव्हे, तर कारखान्याच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.१९८८ च्या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक स्व. आप्पासाहेब नलवडे यांच्या विरोधात शिंदे-कुपेकर-हत्तरकी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर होऊन कुपेकर गटाचा कारखान्यात पहिल्यांदाच प्रवेश झाला. त्यानंतर कुपेकर गटाचे डॉ. शरदचंद्र तथा कुमार शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे आली. १९९३ च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांना हटविण्यासाठी नलवडे-कुपेकर एकत्र आले. त्यानंतरही कुपेकर गटाच्याच डॉ. प्रकाश शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांनी विधानसभेला बाबा कुपेकर यांनाच आव्हान दिले. २००० च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांना हटविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘शिंदे-कुपेकर’ आघाडीने बाजी मारली. त्यानंतर अध्यक्षपदी शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी कुपेकर गटाच्या प्रकाश चव्हाण यांची निवड झाली. दरम्यान, चव्हाण यांनीदेखील विधानसभेला कुपेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली. २००५ च्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे-चव्हाण-हत्तरकी आघाडीच्या विरोधात कुपेकर व शहापूकर गट असा तिरंगी सामना झाला. विधानसभेच्या अध्यक्षपदावर असतानाही कुपेकर यांनी कारखान्याची निवडणूक लढविली. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलला दारुण पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून या निवडणुकीपर्यंत कारखान्यात राष्ट्रवादीचा एकही संचालक नव्हता. तथापि, बदलत्या राजकारणाचा वेध घेत आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष शिंदे यांच्याशी युती केली. त्यामुळेच मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे यांच्या आघाडीला कारखान्याची सत्ता मिळाली. संचालक मंडळाच्या १९ पैकी ११ जागा या आघाडीला मिळाल्या. त्यात राष्ट्रवादीचे पाच संचालक आहेत.स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीतदेखील आमदार मुश्रीफ यांनी संध्यादेवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ दिले. किंबहुना, त्यामुळेच गडहिंग्लज कारखान्यात राष्ट्रवादीचा दमदार पुनर्प्रवेश झाला आहे.आमदार मुश्रीफ व कुपेकर यांचा मुत्सद्दीपणा व बेरजेच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीला तब्बल दहा वर्षांनंतर कारखान्यात पुनर्प्रवेश मिळाला आहे. सत्ताधारी ‘मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे’ आघाडीत सर्वाधिक पाच संचालक राष्ट्रवादीचे आहेत. मुश्रीफ-शिंदे-कुपेकर यांना एकत्र आणण्यात जयसिंग चव्हाण, सतीश पाटील व अमर चव्हाण यांनी भूमिका बजावली. प्रसंगी पत्नीची उमेदवारी मागे घेऊन जयकुमार मुन्नोळी यांनीही त्यांना मोलाची साथ दिली.