शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

भटक्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:03 IST

भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला.

ठळक मुद्देशंखध्वनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोकोचा प्रयत्न ‘महसूल’ने जमीन न दिल्याने ‘भटक्यां’ना हक्काचे घर नाही

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली; मात्र या योजनेसाठी महसूल विभागाने जमीन उपलब्ध करून दिली नाही, तर सामाजिक न्याय विभागानेही दुर्लक्ष केले; त्यामुळे ही योजना कागदावरच राहून आतापर्यंत भटक्या विमुक्तांसाठी एकही घर उभे राहिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला.दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. फुलांचे हार घातलेले व अंगाला गुलाल लावलेली दोन गाढवं मोर्चाच्या अग्रभागी होती. जोरदार घोषणा देत हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी जोरदार घोेषणा देत, सरकारविरोधात शंखध्वनी करण्यात आला. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

घोषणा सुरू असताना अचानक काही आंदोलकांनी ठिय्या मारत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांची समजूत काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. यानंतर आंदोलकांनी तीव्र निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.भटक्या विमुक्त समाजासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०११ ला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली; परंतु त्याची आजतागायत अंमलबजावणी न झाल्याने अनेकजण हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच रेशनकार्ड, जातीचे दाखले काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून भटक्या विमुक्तांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. आंदोलनात भीमराव साठे, सुरेश जाधव, प्रदीप लोंढे, नंदकुमार साठे, संजय धोंगडे, रमेश जाधव, रेखा नंदीवाले, बेबीताई गोसावी यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी अध्यक्ष असूनही दुर्लक्षया योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे व सचिव हे सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त आहेत. महसूल विभागाने जमीन उपलब्ध करून दिलेली नाही, तर सामाजिक न्याय विभागाने झोपेचे सोंग घेतलेय, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर