शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

भाजीपाला बाजारांमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

इचलकरंजी : राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.२२) रात्रीपासून कडक नियमांची घोषणा करण्यात आली आहे. असे ...

इचलकरंजी : राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.२२) रात्रीपासून कडक नियमांची घोषणा करण्यात आली आहे. असे असतानाही शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, राधाकृष्ण टॉकीज परिसर, वडगाव कृषी बाजार समितीमध्ये बाजार भरला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा पुन्हा फज्जा उडाला. त्यावर प्रशासनाकडून कोणताही वचक नसल्याने उदासीन भूमिका दिसून आली.

अत्यावश्यक सेवेमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला विक्री करण्यास परवानगी दिली होती. या वेळेमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलीस व नगरपालिका कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसत होते. आठवड्यातून भरणारा बाजार ‘जैसे थे’च होता.

दरम्यान, नगरपालिकेच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. तीही शुक्रवारी बंद असल्याने अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे पुन्हा नगरपालिकेच्या ढिसाळ कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरात आंबा खरेदीसह आइस्क्रीम खाण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनाही जीवनावश्यक म्हणजे काय, याचा अर्थ समजला नाही, अशी भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत होती. त्याचबरोबर प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त होत होती.