शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

रामचंद्र माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By admin | Updated: February 1, 2017 00:20 IST

सैनिकी परंपरा जपलेल्या रामपूरवाडीचा जवान हरपला : पहिल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभाग

लखन घोरपडे --देशिंग --कवठेमहांकाळ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सुमारे शंभर लोकवस्तीचे रामपूरवाडी हे गाव, जवान रामचंद्र शामराव माने यांच्या सीमेवरील बलिदानानंतर सुन्न झाले आहे. देशसेवा बजावत असताना माने हिमस्खलनात शहीद झाल्याची बातमी सोमवारी गावात समजताच रामपूरवाडीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता लष्करी इतमामात माने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शंभरावर लोकवस्ती असलेल्या रामपूरवाडीतील २९ सैनिक सध्या देशसेवा बजावत आहेत, तर २७ जण देशसेवा संपवून निवृत्त झाले आहेत. सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील जिगरबाज जवान रामचंद्र माने शहीद झाल्याने वातावरण भावूक दिसून येत होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई सुलाबाई यांनी मोठ्या कष्टातून मोठा मुलगा भानुदास यांना सैन्यात भरती केले. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गावात शेती परवडत नसल्याने रामचंद्र २००१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कवठेमहांकाळ येथे लष्करात भरती झाले. त्यांच्यापाठोपाठ लहान भाऊ अनिलही सैन्यातच दाखल झाला आणि माने कुटुंबातील तीनही भाऊ देशसेवेत दाखल झाले.गतवर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये रामचंद्र माने यांचा सहभाग होता. रामचंद्र शहीद झाल्याचे वृत्त येताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. थोरले बंधू भानुदास गतवर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले आहेत. रामचंद्र दिवाळीदरम्यान गावी येऊन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुले संकेत व रोहन, मोठा भाऊ भानुदास, लहान भाऊ अनिल, आई सुलाबाई असा परिवार आहे.सकाळी नऊ वाजता अंत्ययात्राशहीद जवान रामचंद्र माने यांचे पार्थिव बुधवारी सकाळी सात वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने कवठेमहांकाळ येथे आणण्यात येणार आहे. तेथून सकाळी नऊ वाजता रामपूरवाडी येथे गावी ते आणले जाणार आहे. गावातून सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. घरापासून काही अंतरावर शहीद माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष प्रदीप ढोले उपस्थित राहणार आहेत.मुलांना अधिकारीच बनविणार!शहीद रामचंद्र माने यांचा मुलगा संकेत तिसरीत, तर रोहन पहिलीत आहे. दोघेही सातारा येथील सैनिकी शाळेत शिकत आहेत. मी सैन्यात शिपाई असलो तरी, माझी मुले अधिकारी बनविणार, अशी रामचंद्र यांची जिद्द होती. ती आम्ही पूर्ण करणारच, अशी प्रतिक्रिया त्यांचे भाऊ भानुदास यांनी दिलीफलक उभारून गावकऱ्यांची आदरांजलीजिद्दीच्या जोरावर सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावत असताना शहीद झालेल्या माने यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘रामचंद्र माने अमर रहे’ असे फलक गावात लावण्यात आले आहेत.