शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांतेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने ...

कोल्हापूर : लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.

लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत पाच कोरोनाबाधित मृतदेहांवर गॅसदाहिनीत विना नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आपलेच नातेवाईक असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले. नऊ नियमित मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. इतरवेळी स्मशानभूमीत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, लाॅकडाऊन आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत शनिवारी मात्र अगदीच नगण्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मशानभूमी असली तरी या स्मशानभूमीत वर्दळ असते. मात्र, शनिवारी दिवसभर अगदीच शब्दाप्रमाणे स्मशानशांतता होती.

चौकट

३० लाख शेणीची व्यवस्था..

कोविडच्या पहिल्या लाटेत अनेकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. अनेकांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. ही पार्श्वभूमी लक्षा घेता महापालिका प्रशासनाने अशी वेळ पुन्हा येऊ नये याकरिता ३० लाख शेणी, २०० टन लाकूड अशी सज्जता ठेवली आहे. याशिवाय २०० टन आगाऊ लाकूड मागवले आहे. तीन प्रहरात प्रत्येकी आठ कर्मचारी असे २४ जण दिवसरात्र कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला पीपीई किट आणि कोरोनासंबंधी सुरक्षा साहित्य पुरविण्यात आले आहे.

मोफत दहनाची परंपरा आजही

केवळ एक कापराची डबी, तीनशे शेणी आणि एक मण अर्थात ४० किलो लाकडांमध्ये एका व्यक्तीचे दहन होते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मूळच्या कोल्हापूरकरांची आणि येथील प्रत्येक नागरिकाची जगाचा निरोप घेतल्यानंतर कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीतच आपल्यासह आपल्या नातेवाइकांवरही अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मनोमन इच्छा असते. हीच परंपरा आजही मानवतेच्या दृष्टीने मोफत दहनाद्वारे कोल्हापूर महानगरपालिकेने जपली आहे.

फोटो : १००४२०२१-कोल-स्मशानभूमी

ओळ : कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गर्दी असते. मात्र, शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे नियमित मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर निर्मनुष्य परिस्थितीत अंत्यसंस्कार झाले.

(छाया : आदित्य वेल्हाळ)