शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांतेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST

कोल्हापूर : लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने ...

कोल्हापूर : लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.

लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत पाच कोरोनाबाधित मृतदेहांवर गॅसदाहिनीत विना नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आपलेच नातेवाईक असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले. नऊ नियमित मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. इतरवेळी स्मशानभूमीत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, लाॅकडाऊन आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत शनिवारी मात्र अगदीच नगण्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मशानभूमी असली तरी या स्मशानभूमीत वर्दळ असते. मात्र, शनिवारी दिवसभर अगदीच शब्दाप्रमाणे स्मशानशांतता होती.

चौकट

३० लाख शेणीची व्यवस्था..

कोविडच्या पहिल्या लाटेत अनेकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. अनेकांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. ही पार्श्वभूमी लक्षा घेता महापालिका प्रशासनाने अशी वेळ पुन्हा येऊ नये याकरिता ३० लाख शेणी, २०० टन लाकूड अशी सज्जता ठेवली आहे. याशिवाय २०० टन आगाऊ लाकूड मागवले आहे. तीन प्रहरात प्रत्येकी आठ कर्मचारी असे २४ जण दिवसरात्र कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला पीपीई किट आणि कोरोनासंबंधी सुरक्षा साहित्य पुरविण्यात आले आहे.

मोफत दहनाची परंपरा आजही

केवळ एक कापराची डबी, तीनशे शेणी आणि एक मण अर्थात ४० किलो लाकडांमध्ये एका व्यक्तीचे दहन होते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मूळच्या कोल्हापूरकरांची आणि येथील प्रत्येक नागरिकाची जगाचा निरोप घेतल्यानंतर कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीतच आपल्यासह आपल्या नातेवाइकांवरही अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मनोमन इच्छा असते. हीच परंपरा आजही मानवतेच्या दृष्टीने मोफत दहनाद्वारे कोल्हापूर महानगरपालिकेने जपली आहे.

फोटो : १००४२०२१-कोल-स्मशानभूमी

ओळ : कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गर्दी असते. मात्र, शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे नियमित मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर निर्मनुष्य परिस्थितीत अंत्यसंस्कार झाले.

(छाया : आदित्य वेल्हाळ)