शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

डोणेवाडीत मूलभूत सोयींची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:56 IST

रमेश साबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक खेडी तसेच गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वयंपूर्ण होत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र राधानगरी तालुक्यातील तळगांवपैकी डोणेवाडी हे गाव, स्वातंत्र्याची सत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून कोसो ...

रमेश साबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक खेडी तसेच गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वयंपूर्ण होत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र राधानगरी तालुक्यातील तळगांवपैकी डोणेवाडी हे गाव, स्वातंत्र्याची सत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून कोसो मैल दूर असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.ग्रुप ग्रामपंचायत तळगांव अंतर्गत सात वाड्यांपैकी एक असणारी डोणेवाडी. दहा-बारा घरे असणाऱ्या या वाडीची लोकसंख्या म्हणाल तर, जवळपास शंभरच्या घरात. तळगाव पासून तीन किलोमीटर दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेली वाडी. अगदी दोन वर्षांच्या बालकापासून ते ऐंशी वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्ती येथे वास्तव्य करतात. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय पण, तोही पावसाच्या पाण्यावर. गावात रस्ता नसल्याने तळगांवपासून तीन किलोमीटर डोंगरदºयातील पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. कुणीतरी आजारी पडलं तर याच पायवाटेने डोलीच्या साहाय्याने त्याला तळगावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणावे लागते. गावात अंगणवाडी नसल्याने येथील मुलांना थेट पहिलीला प्रवेश दिला जातो. शाळेसाठी जाणारा रस्ता खूपच अडचणीचा असल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. पावसाळ्यात तर येथील नागरिकांना जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत.गावात वीज नसल्याने येथील नागरिकांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. रेशनकार्डवर महिन्यातून एकदा मिळणाºया अत्यल्प प्रमाणातील रॉकेलवरच घरातील कामे तसेच मुलांना अभ्यास करावा लागतो. घरांसभोवताली दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने जंगली श्वापदे नागरी वस्तीकडे येतात. सहा वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत. त्यापासून वीज आज येणार, उद्या येणार, या आशेवरच अधिकाºयांनी ठेवले आहे. याबाबत वारंवार हेलपाटे मारुनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना या गोष्टीचे गांभीर्य नसल्याचे येथील नागरिक सांगतात. येथील नागरिकांना जंगलातील जिवंत झºयाचा शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आधार घ्यावा लागतो. नळ योजना नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. डिसेंबर-जानेवारीमध्ये असणारे हे पाणी फेब्रुवारीनंतर अत्यल्प प्रमाण असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत जातो. निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वजण येथे येऊन रस्ते, वीज, पाणी, पूर्ततेचे आश्वासन देतात; मात्र, निवडणुका झाल्या की दिलेल्या आश्वासनांचा नेत्यांना विसर पडतो असे येथील नागरिकांनी सांगितले.